आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्मरणशक्ती वाढण्यासाठी, फ्रेश राहाण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते. परंतु, जखमा भरुन येण्यासाठीही चांगल्या निद्रेची गरज असते. जखमा भरून येण्यासाठी आवश्यक पोषणमुल्यांपेक्षा निद्रेची मदत जास्त होते, असे अमेरिकेतील नाटिक येथील आर्मी रिसर्च इन्स्टीट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल मेडिसिनमध्ये केलेल्या संशोधनात संशोधक ट्रेसी स्मिथ आणि त्यांच्या सहकार्यांना आढळून आले आहे.
काय आढळले संशोधनात
1 पौषणमुल्यांचा जखम भरण्यासाठी थेट उपयोग झाला नसल्याचे दिसून आले.
2 ज्या लोकांनी पौष्टीक पेय प्यायले होते त्यांच्या जखमांमधील द्रावाची चाचणी केल्यावर जखमेशी लढाई करण्यासाठी त्यांच्या शरीराने चांगली तयारी केल्याचे दिसले. मात्र जखम भरुन येण्याची गती वाढल्याचे त्यात दिसले नाही.
3 झोप न मिळाल्यास रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम होतो आणि नंतर जखम भरून येण्यावर परिणाम होतो. या प्रयोगातून दिसलेले निरीक्षण अत्यंत योग्य आहे, असे मत कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील निद्रातज्ज्ञ क्लेट कुशिदा यांनी व्यक्त केले आहे.