आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जठरात आम्लाचे प्रमाण वाढले की छातीचा पिंजरा विभाजक पडदा ( डायफ्रॅम ) स्नायुयुक्त पडदा आकुंचन पावतो. यामुळे स्नायुयुक्त पडद्याच्या आकुंचनाने फुफ्फुसामध्ये हवा जाण्यास विरोध निर्माण होतो. त्यामुळे उचकी येते. उचकी लागणे, ही एक ‘रिफ्लेक्स अॅक्शन’ आहे. उचकी थांबवण्यासाठी साधरणपणे पाणी पितात. मात्र तरीही उचकी थांबत नाही. उचकी रोखणे खूप अवघड होऊ जाते. प्रत्येक वेळेस पाणी पिणे हाच उचकीवरील उपाय नसू शकतो कारण उचकी येण्याची अनेक कारणे असतात. काही घरगुती उपायांनीही उचकी थांबवली जाऊ शकते.
उचक्या थांबवण्यासाठी घरगुती उपाय –
१) श्वास रोखून ठेवा
उचकी थांबवण्यासाठी दीर्घ श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवावा. त्यामुळे फुफ्फुसात हवा भरुन राहते आणि उचकी आपोआप थांबते.
२) मीठाचे पाणी
मिठाचे पाणी थोड्या-थोड्या वेळाने प्या.
३) काळे मिरे
तीन काळे मिरे आणि खडीसाखरेचे पाणी प्या.
४) साखर
उचकी आल्यावर त्वरीत एक चमचा साखर खा किंवा साखरेच्या पाण्यात थोडं मीठ टाकून थोडं थोडं प्या.
५) चॉकलेट पावडर
उचकी थांबवण्यासाठी एक चमचा चॉकलेट पावडर खा.
६) सावकाश जेवण करा
फास्ट खाल्ल्याने किंवा अधिक तिखट खाल्ल्याने उचकी लागते. त्यामुळे जेवण नेहमी सावकाश करत जा.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)