आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी जास्त खारट पाण्याने गुळण्या करू नये. याचा परिणाम रक्तदाबांवर होऊ शकतो. कोरोनाच्या Corona काळात लोकांचे जीवन बदलून गेले आहे. कोरोना काळात लोक गरम पाणी आणि काढा घेत आहेत, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोना (Corona) संक्रमित व्यक्ती घरगुती उपचारांचा अवलंब करीत आहेत. कोरोना संक्रमणासह सामान्य लोक गरम पाणी आणि स्टीम देखील घेत आहेत.
गुळण्या तोंडाच्या स्वच्छतेसाठी आवश्यक
डॉक्टरांचे म्हणणे आहे की गुळण्या केल्याने घशातील घाण साफ होते. जर घसा खराब झाला असेल किंवा कोणत्याही प्रकारची सूज येत असेल तर गुळण्या केल्याने आराम मिळतो. आजकाल लोक मीठ आणि हळदच्या पाण्याने गुळण्या करत आहेत. परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तोंडाच्या स्वच्छतेसाठी गुळण्या आवश्यक आहे. आपल्याला कफची समस्या दूर होईल.
‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या
गुळण्या कशा आणि कोणत्या गोष्टीने कराव्या
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
जर आपल्याला जास्त त्रास होत नसेल तर आपण कोमट पाण्यात चिमूटभर मीठ घालून गुळण्या करू शकता. तसेच गुळण्या दिवसामध्ये तीनपेक्षा जास्त वेळा करु नये.
कोविड-19 आणि ब्लॅक फंगस संसर्ग एकाच वेळी होऊ शकतो का? जाणून घ्या
हळद पाण्याने गुळण्या
हळदीमध्ये अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. हळद अनेक प्रकारच्या समस्या दूर करते. परंतु यासाठी आपण ते योग्य प्रमाणात वापरणे महत्वाचे आहे. जास्त वापरल्याने नुकसान होऊ शकते.
बीटाडीन ने गुळण्या
जर आपल्या घशात कोणत्याही प्रकारची सूज येत असेल किंवा आपल्याला घशात वेदना होत असेल तर आपण पाण्यात बीटाडीन टाकून गुळण्या करू शकता. बीटाडीन हे संक्रमणांपासून मुक्त होण्यासाठी अँटीबैक्टीरियल औषध आहे.
किती वेळा गुळण्या कराव्या
एका सामान्य व्यक्तीने दिवसातून तीन वेळा गुळण्या केल्या पाहिजे. डॉक्टर बर्याचदा जेवणानंतर गुळण्या करण्यास सांगतात न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणानंतर आपण गुळण्या करू शकता. जास्त गरम पाणी होऊ नये, याकडे लक्ष दिले पाहिजे. आपणास पाहिजे असेल तर आपण सामान्य पाण्यानेही गुळण्या करू शकता. आपण गुळण्या करून तोंड स्वच्छता ठेवू शकता.
जास्त गुळण्या करण्याचे दुष्परिणाम
आपण जास्त प्रमाणात गुळण्या करत असाल तर ते आपल्यासाठी हानिकारक असू शकते. बरेच लोक दिवसातून अनेक वेळा गुळण्या करतात, यामुळे त्यांच्या घशात सूज येते. म्हणून जास्त गुळण्या करू नका.
विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी जास्त खारट पाण्याने गुळण्या करू नये. याचा परिणाम रक्तदाबांवर होऊ शकतो वारंवार गुळण्या केल्याने घशात पुरळ येते. त्याच वेळी जास्त गरम पाण्याने गुळण्या केल्यास आपल्या घश्यात अल्सर होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुळण्या करणे चांगले होईल.
अशाप्रकारे गुळण्यासाठी पाणी तयार करा
हे लिक्विड तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी गरम होण्यासाठी ठेवा. पाणी चांगले उकळण्यास सुरवात झाली की नंतर दोन चिमूटभर हळद आणि थोडस सेंधा मीठ घाला. आता हे पाणी थोडे थंड होऊ द्या. जेणेकरून आपण त्याने गुळण्या करू शकतो.
हळद आणि सेंधा मीठचे जे पाणी आपण गुळण्या करण्यासाठी तयार केले त्यानी आणि वाफ घ्या तुमच्या श्वासोच्छवासाद्वारे नाकात पोहोचलेला कोरोना विषाणू तेथेच संपेल. तसेच आपले नाक साफ होईल.
कोरोना विषाणूचा नाश होईल याचा कोणताच पुरावा नाही
कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त पाणी पिऊन किंवा गरम पाणी व मीठ मिसळून गुळण्या केल्याने बरा होतो. हे अगदी खरे आहे की मीठ टाकल्यानंतर गरम पाण्याचा वापर केला जातो. घसा खवखवणे आणि कफ दूर करण्यासाठी हा एक घरगुती उपचार आहे, परंतु आतापर्यंत या धोकादायक कोरोना विषाणूचा Corona नाश होईल याचा पुरावा मिळालेला नाही.
संक्रमण आता आपल्या देशात देखील कम्युनिटी लेवल आले आहे. यावेळी जर कुणीही आपल्याला या विषाणूच्या Corona तावडीतून वाचवू शकेल तर ते आहे अतिदक्षता. मास्क आपल्याला संरक्षण देत आहे. परंतु व्हायरस मास्कला फसवेल आणि आत प्रवेश करत आहे, त्यामुक दररोज तो दूर करणे आवश्यक आहे. जेणेकरून तो वाढणार नाही.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
पोटाची चरबी कमी करायची असेल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 5 फळे, जाणून घ्या
सर्दी-तापाचा Virus करू शकतो कोरोनावर मात, वैज्ञानिकांचा दावा