आरोग्यनामा ऑनलाईन- भारतात भात खाणे पसंत करणाऱ्यांची संख्या खूप आहे. अशी काही राज्ये आहेत, जिथे फक्त भातच खाल्ला जातो. परंतु तंदुरुस्ती आणि वजन कमी झाल्यामुळे आपण भात खाण्यास असमर्थ आहोत. लोकांचा असा विश्वास आहे की भात खाण्यानं वजन वाढतं(gaining weight). भातामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात आढळतात. जे शरीरात उर्जा वाढवण्याचे काम करतात, परंतु कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने वजन(gaining weight) आणि साखर दोन्ही वाढते, म्हणूनच लठ्ठ लोकांना भात कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.
तुम्हालाही भात खाण्याची आवड आहे, पण खायला मिळत नसेल तर तुम्हाला नाराज होण्याची गरज नाही. आता तुम्ही भात मनापासून खाऊ शकता. आणि यामुळे तुमचे वजनही वाढणार नाही.
श्रीलंका येथील शास्त्रज्ञांच्या मते, भात शिजवण्याचा आणि खाण्याचा एक मार्ग सापडला आहे, ज्यामुळे भातात असलेल्या कॅलरी कमी होतात. ही पद्धत जगभरात पसंत केली जात आहे. जर तुम्हालाही भात शिजवण्याची आणि खाण्याची सवय लागली असेल तर, भात खाऊन तुमचे कधीच वजन वाढणार नाही.
अशाप्रकारे भात बनवा.
१) तांदूळ चांगले धुवा आणि ते १५ मिनिटे पाण्यात भिजवा.
२)कुकरमध्ये १ चमचा नारळ तेल घाला.
३)तेलामध्ये तांदूळ १ मिनिटे तळा आणि नंतर पाणी घाला.
४)कुकर बंद करा आणि मंद आचेवर शिजू द्या.
५)तांदूळ शिजल्यानंतर थंड होऊ द्या आणि नंतर ते १२ तास फ्रिजमध्ये ठेवा.
६)१२ तासांनंतर, आपण भात खाऊ शकता.
असा भात खाण्याचे फायदे
शास्त्रज्ञांच्या मते, शिजवलेला भात अशा प्रकारे खाण्यामुळे तांदळामध्ये असणारी ५०% -६०% कॅलरी कमी होते. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो. जर तुम्ही असा शिजवलेला भात बराच वेळा खाल्ला तरी तुमचे वजन वाढणार नाही. तांदळापासून उष्मांक कमी करण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे त्यातील पाणी काढून टाका.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.