पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्मरणशक्ती कमी होणे म्हणजे वाढत जाणारा विसराळूपणा ही एक गंभीर समस्या आपल्या समाजात येत आहे. वाढते वय आणि वृध्दांची संख्या हे त्याचे प्रमुख कारण आहे. या आजाराने अनेक व्यक्ती एक प्रकारे अपंग होतात. हळूहळू दैनंदिन व्यवहार करणेही अवघड व्हायला लागते. या आजारावर काही कारणे आहेत. उतारवयात रक्तप्रवाह कमी व्हायला लागतो. रक्तवाहिन्या अरुंद होतात. आणि शरीरातील अनेक इंद्रियांमध्ये बिघाड होतात. त्यामुळे आपल्याला विसराळूपणा येतो.
विसराळूपणाची लक्षणे
१) या आजाराचे मुख्य कारण म्हणजे आपली स्मरणशक्ती कमी होते.
२) आपले भाषाकौशल्य कमी होते.कुठेही ध्यान लागत नाही. आपली समज कमी होत जाते.
३) आपली रचनात्मक बुध्दीकौशल्ये कमी होतात. भान, स्थळ, काळ आणि ओळख कमी होते.
४) कोणतीही समस्या-सोडवणुकीची क्षमता कमी होते.
५) कार्य-कुशलता कमी होते. असा माणूस पूर्णपणे मनविरहीत आणि परावलंबी होतो. ही परिस्थिती घरात सर्वांनाच दु:ख व पीडादायक असते. या आजाराचे निदान झाल्यानंतर साधारणपणे 7-8 वर्षात या व्यक्तीचा मृत्यू येतो.
या आजाराचे व्यवस्थापन कसे कराल
या आजारावर अजून औषधे अद्याप मिळालेली नाहीत. काही औषधांचा वापर केला जातो, पण उपयोग मर्यादित आहे. याशिवाय काही मानसोपचारांचा अभ्यास चालू आहे. घरातल्या इतर व्यक्तींवर या आजारी माणसाची विशेष जबाबदारी येऊन पडते. खोली, वस्तू, व्यवहार सुरक्षित होतील अशी काळजी घ्यायला पाहिजे, उदा. चालताना खाली पायात अडथळा येणा-या वस्तू-रचना काढून टाकणे, इ. काही वेळेला या व्यक्तीवर मुद्दाम बंधनेही घालावी लागतात. आहार ब-याच रुग्णांना अन्न भरवावे लागते. काही रुग्ण गिळू शकत नाहीत. त्यांना टयूब नळी घालावी लागते. या नळीतून अन्न द्यावे लागते. या गोष्टी शिकाव्या लागतात किंवा प्रशिक्षित व्यक्ती मदतनीस म्हणून लागतात. स्वच्छता डोळे, तोंड व दात, नाक, त्वचा, जखमा, इ. ची स्वच्छता सांभाळायला लागते. या गोष्टी रुग्णाला करून द्याव्या लागतात.