आरोग्यनामा ऑनलाइन टीम – फळे जास्त खाल्ल्याने कॅलरीज वाढतात आणि वजन कमी होण्याऐवजी वाढते. यासाठी कोणती फळे, किती प्रमाणात खावी, हे महत्वाचे ठरते. जास्त फळे खाल्ली तर आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
हे लक्षात ठेवा
१) वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फळे खावीत. पण हे अर्धसत्य आहे. कारण, फळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील कॅलरीजची संख्या वाढते. यामुळे वजनही वाढते.
२) योग्य प्रमाणात नियमित फलाहार करावा. याच्यासोबत भाज्या, प्रोटिन्स, आणि होल ग्रेन्स हे देखील खावे.
३) काही फळांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असू शकते. आपण किती आणि कोणती फळे खातो त्यावरही त्यातून किती कॅलरीज शरीरात जातात ते अवलंबून आहे.
४) ताज्या फळामध्ये साधारणपणे १५ ते २० कॅलरीज असतात. मध्यम आकाराच्या सफरचंदात शंभर कॅलरीज असतात. आरोग्यदायी आहारासाठी रोज तीन सफरचंद खाल्ली तरी तीनशे कॅलरीज होतात.
५) ड्रायफ्रुट्समध्ये तर जास्त कॅलरीज असतात.
६) शरीर आणि मनाचे योग्य संतुलन राखण्यासाठी रोज फळे खावीत. पण त्याचा अतिरेक नको.
* या फळांनी वाढते वजन
केळी, द्राक्षे, खजूर, ड्रायफ्रूटस, पेरू, आंबा, चिकू यासारखी फळं जास्त खाल्ली तर शरीरातील कॅलरीज वाढू शकतात.
* हे आवश्य खावे
पालक, भोपळा, मुळा, काकडी, मशरूम्स.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)