आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कामाचा व्याप, जीवघेणी स्पर्धा, धावपळ, मानसिक ताणतणाव यामुळे कामावरून संधाकाळी घरी आल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. बहुतांश लोकांना ही समस्या जाणवते. संध्याकाळी घरी आल्यानंतर थकवा जाणवत असल्यास काही सुपर फुड्स सेवन केल्यास थकवा लगेच दूर होऊ शकतो.
लिंबू पाणी
संत्री, मोसंबीचा ज्यूस अथवा लिंबू पाणी घ्या. यातील विटॅमिन सी मुळे कमजोरी दूर होते. शरीरास ऊर्जा मिळते.
खजूर
संध्याकाळी थकवा जाणवत असल्यास चार-पाच खजूर खा. यातील फ्रक्टोज आणि ग्लूकोजमुळे तात्काळ ऊर्जा मिळते.
दही
दही खाल्ल्याने सुद्धा थकवा दूर होतो. यातील कार्बोहायड्रेट आणि फायबर हे थकवा दूर होतो.
केळी
तात्काळ उर्जा मिळवण्यासाठी केळी खावीत. यातील पोटॅशियम आणि विटॅमिन बी मुळे ताबडतोब उर्जा मिळते.
बदाम
बदामाचे सेवन केल्यास थकवा लगेच दूर होईल. कारण यात विटॅमिन बी आणि रायबोफ्लेविन भरपूर असते.
कॉफी
यातील कॅफिनमुळे मेंदू अॅक्टिव होतो. थकवा दूर होतो.
नारळ पाणी
नारळ पाणी सेवन केल्याने कमजोरी लगेच दूर होते.