आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सुंदर केसांमुळे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. म्हणूनच महिला नियमित शाम्पू लावण्यासह विविध उपाय करत असतात. परंतु, काही शाम्पूमध्ये केमिकल्स असल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. शाम्पूमध्ये काही नैसर्गिक पदार्थ मिसळल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. यामुळे केसांच्या विविध समस्या दूर होतात. शाम्पूमध्ये कोणते पदार्थ मिसळावेत, आणि त्यामुळे कोणते फायदे होतात, याविषयी जाणून घेवूयात.
हे पदार्थ मिसळा
१) पुदिन्याचा रस
केसांचा तेलकटपणा दूर होतो.
२) काकडीचा रस
केसांचा कोरडेपणा दूर होतो.
३) आवळ्याचा रस
शाम्पूमध्ये आवळ्याचा रस मिसळल्यास कोंडा दूर होतो.
४) गुलाब जल
केसांचा कोरडेपणा दूर होतो.
५) ग्रीन टी
केस गळणे थांबते, दाट होतात.
६) एलोवेरा ज्यूस
शाम्पूमध्ये एलोवेरा ज्यूस मिसळून लावल्यास खाज दूर होते.
७) ऑलिव्ह ऑइल
हे शाम्पूमध्ये मिसळल्यास केसांची चमक वाढते.
८) पीठी साखर
केस मुलायम आणि चमकदार होतात.
९) लिंबाचा रस
शाम्पूमध्ये लिंबाचा रस मिसळल्यास कोंडा दूर होतो.
शाम्पूमध्ये मध मिसळल्यास केसगळती पूर्णपणे थांबते.