आरोग्यानामा ऑनलाइन टीम : आपल्या प्राचीन संस्कृतीत प्रत्येक समस्येवर उपाय सांगितले गेले आहेत. निसर्गाला आपल्या संस्कृतीत खूप महत्व आहे. निसर्ग, वनस्पती, प्राणी यांच्यातही आपली संस्कृती इश्वाराचे रूप असल्याचे मानते. अशा आदर्शवत संस्कृतीत वैवाहिक जीवनालाही तवढेच महत्व आहे. आयुर्वेद आणि योगशास्त्रात आरोग्याबद्दल मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत. प्रजनन आणि संतती उत्पत्ती या विषयीही भरपूर माहिती शास्त्रात आहे. आयुर्वेदातील प्राचीन ग्रंथ चरक संहितेत संतती आणि बुद्धीसंततीचे वर्णन आहे. सुसंततीसाठी रसायन औषधींची माहितीही आहे.
आयुर्वेद आणि योगशास्त्रात सुसंततीसाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. आयुर्वेदात सुसंततीसाठी आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. चरक संहितेच्या अतुलगोत्रीय अध्यायात मैथुन अर्थात सेक्ससाठी योग्य आणि अयोग्य स्त्रीची माहिती सविस्तर देण्यात आली आहे. विकृत मानसिक अवस्थेतून निपजणाऱ्या विकृत संतानांच्या उत्पत्तीचेही वर्णन आहे. तसेच सुसंततीसाठी मार्गदर्शनही आहे. त्याकाळी कुटुंबनियोजनाची आवश्यकता नसल्याने आपल्या आयुर्वेदात कुटुंबनियोजनाविषयी सविस्तर माहिती नाही. विविध प्राचीन ग्रंथांमध्ये गर्भस्थापना आणि प्रजास्थापन द्रव्य याविषयी माहिती आहे. १८ व्या शतकानंतरच्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये मात्र संतती नियमनविषयक बरीच माहिती आहे.
आयुर्वेदात गर्भनिरोधासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. याने कुटुंबनियोजन करणे शक्य आहे. आर्तव दर्शन किंवा मासीक पाळी (१ ते ४ दिवस). नंतर ऋतुकाल १२ दिवसाचा काळ (५ ते १७ दिवस) हा आचार्यांनी गर्भ उत्पत्तीसाठी अनुकूल असल्याचे म्हटले आहे. यानंतरचा ९ ते १३ दिवसांचा काळ (१८ ते २८ दिवस) ऋतुव्यतीतकाल असल्याचे म्हटले आहे. ऋतुकालात सेक्स केल्याने गर्भधारणा होते. ऋतुव्यतीत काळात सेक्स केले तरी गर्भधारणेची जवळपास शक्यता नसते. आधुनिक विज्ञानानेही हेच मान्य केले आहे. ऋतुव्यतीत काळाला आधुनिक विज्ञानात सेफ पिरीयड म्हटले जाते. महर्षी चरक यांनी स्त्रीला विविध शारीरिक स्थितीत ठेवून तिच्याशी सेक्स करण्याला चुकीचे मानले आहे. या स्थितीत सेक्स करणे धोकादायक असू शकते असे चरक महर्षींनी म्हटले आहे. उजवीकडे किंवा डावीकडे झोपवून सेक्स करणे हानीकारक असल्याचे म्हटले आहे. तर नासिका किंवा नाडी शोधन करून इच्छेनुसार संतान प्राप्ती करता येऊ शकते, असे महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे.