आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भातात जीवनसत्त्वांचा भरपूर साठा असल्याने यातून शरीराला भरपूर उर्जा मिळते. उच्च रक्तदाब अणि मानसिक ताणतणाव असलेल्या व्यक्तींसाठी भात खुपच लाभदायक ठरू शकतो. तसेच त्वचेसाठी सुद्धा भात उपयुक्त आहे. नुसत्या भातापेक्षा ब्राऊन राईस खाल्ला तर आरोग्यासाठी तो जास्त फायदेशीर आहे. भात नियमित खाल्ल्याने कोणते फायदे होतात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
हे आहेत फायदे
१) त्वचेसाठी भात खूप उपयुक्त आहे. तांदळाची पावडर त्वचेसाठी लाभदायी ठरू शकते.
२) विस्मृतीचा धोका भातामुळे कमी होत असल्याने अल्झायमरसारखा आजार दूर राहतो.
३) खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी, लघवीचे प्रमाण वाढण्यासाठी भात लाभदायक आहे.
४) भातात ड जीवनसत्त्व, कॅल्शियम, लोह, फायबर्स इत्यादि घटक मोठ्या प्रमाणात असतात.
५) हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
६) यातील अविद्राव्य फायबर्समुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते.
७) यामुळे शरीराला झटकन उर्जा मिळते.
८) शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी इंधनाचे कार्य भात करतो.
९) यात सोडियम असल्याने हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
१०) यातील अविद्राव्य फायबर्समुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरला प्रतिबंध होतो.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)