आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वांचेच आयुष्य गतिमान झाले आहे. कामाचा ताणतणाव आणि धावपळ यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा स्थितीत शरीरावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येते. हे टाळायचे असल्यास आहाराबाबत तरी सजग असणे गरजेचे आहे. आहारात काही चांगल्या गोष्टींचा समावेश केला तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. काही पदार्थ असे आहेत ज्यांच्या सेवनामुळे शरीराला पोषक तत्त्वे मिळू शकतात. हे पदार्थ कोणते याविषयी जाणून घेवूयात.
अक्रोड, पालक, करवंदे, ब्लॅक, टी ब्रोक्कली, आदीमधून शरीराला भरपूर पोषक तत्त्वे मिळू शकतात. यामुळे स्मरणशक्ती वाढू शकते आणि ताणतणावही कमी होतो. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई असते. त्याचप्रमाणे मुबलक प्रमाणात ओमेगा-३ आइल असते. हे हृदयासाठी अत्यंत चांगले आहे. यामुळे शुगर आणि तणाव कमी होतो. हे मिठाईत किंवा तसेच खाता येते. आठवड्यात एक वाटी अक्रोड खाणे फायद्याचे राहते. तसेच पालकमध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन असते. सोबतच व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के सुद्धा असते. याच्या सेवनाने हृदय सदृढ होते तसेच वाढत्या वयाने कमी होणारी स्मरणशक्ती देखील वाढते. सलाडमध्ये मिसळून त्याचप्रमाणे याला शिजवून किंवा कच्चेदेखील खाता येते.
करवंदे म्हणजेच ब्ल्यूबेरी आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. यामध्ये अँटीऑक्सीडंट तसेच व्हिटॅमिन्स सी आणि फायबर असते. फायबर कोलेस्टेरॉल आणि शुगर नियंत्रणात ठेवतो. अँटीऑक्सीडंट कॅन्सरचा सामना करण्यासाठी लाभदायक ठरतो. फ्रूट सलाडमध्ये मिसळून तसेच दह्यात मिक्स करून हे खाता येते. तसेच ब्लॅक टी सुद्धा आरोग्यासाठी लाभदायक आहे. ब्लॅक टी मध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सीडंट असते. यामुळे रक्तदाब कमी करण्यात मदत होते. गरम पाण्यात चहापत्ती तीन मिनिटांपर्यंत उकळावी नंतर गाळून प्यावे. दिवसातून दोन ते तीन वेळा पिणे शरीरासाठी चांगले आहे.
ब्रोकोली सुद्धा शरीरासाठी लाभदायक आहे. यात व्हिटॅमिन्स सी आणि के तसेच फॉलिक अॅसिड, कॅल्शियम आणि फायबर असते. व्हिटॅमिन के ने रक्त शुद्ध होते. कॅल्शियमने हाडे मजबूत होतात. ब्रोकोली इतर भाज्यांसोबत मिक्स करून शिजवून खावे. काबुली चण्याच्या चटणीसोबत देखील खाता येईल. ब्रोकोली भाजीत एक वाटी टाकवी.