आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही पौष्टीक पदार्थ अनेकजण घरात आणून ठेवतात. जेणेकरून कुटुंबातील सर्वांचे आरोग्य चांगले रहावे. परंतु, हे पदार्थ कसे सेवन करावेत, कसे जतन करावेत आणि किती दिवस घरात ठेवावेत आदी गोष्टींचा विचार करणे खुप महत्वाचे आहे. अशाच काही पदार्थांविषयी आपण माहिती घेणार आहोत.
हे आहेत ते पदार्थ
1 सफरचंद, प्लम सारख्या फळांच्या बीमध्ये हायड्रोजन सायनाईडचे प्रमाण अधिक असते. या फळांच्या बियांचे सेवन करू नये.
2 जायफळ आवश्यक मात्रेहून अधिक सेवन केल्यास आरोग्यास हानिकारक ठरू शकते. हृदयविकार, कमकुवतपणा, यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
3 जुने झालेले बदाम आरोग्यासाठी विषसमान असतात.
4 बटाटे बरेच दिवस ठेवल्याने त्यांना मोड येतात. यामध्ये विष निर्माण होते.
5 मधमाशांच्या पोळ्यातील मध आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण यामध्ये छोटे-छोटे जीव-जंतू असतात. यामुळे उलट्यांचा त्रास, चक्कर येणे यांसारखा त्रास उद्भवू शकतो.