आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बाळंतपणानंतर महिलांनी योग्य आहार घेतल्यास शारीरिक अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. अशावेळी महिलांच्या शरीराला अनेक पोषक द्रव्यांची गरज असते. बाळांतपणानंतर अनेक खाद्यपदार्थांचे प्रमाण वाढवावे लागते. तसेच काही खाद्यपदार्थांपासून दूर राहावे लागते. कारण बाळांतपणानंतर बाळाचे पोषण हे आईच्या दुधावरच होत असते. त्यामुळे बाळांतीणीचा आहार खुप महत्वाचा ठरतो. आईच्या आहारातमध्ये काही चूकीचे पदार्थ आल्यास त्याचा त्रास बाळाला होतो. अशावेळी बाळाचा विचार करून बाळांतपणानंतर आहार ठरवावा लागतो.
काही महिलांच्या शरीरातील बाळंतपणानंतर रक्त कमी होते. त्यामुळे डॉक्टर्स आयरन सप्लिमेंट्स घेण्यास सांगतात. अशावेळी भरपूर क जीवनसत्त्व असलेल्या टोमॅटो, बेक्ड बटाटे आणि सर्व प्रकारच्या आंबट फळांचे सेवन करावे. यामुळे सप्लिमेंट्सचा अधिकाधिक फायदा मिळतो.
सकाळच्या वेळी रक्तातील साखर नियंत्रित राखण्यासाठी महिलांनी नाश्त्यात काबरेहायड्रेट म्हणजेच ब्रेड, सिरियल्स आणि दूधाचे सेवन र्मयादित प्रमाणात करावे आणि प्रथिनांचे म्हणजेच चीज, पीनट बटर आणि सुका मेवा आदींचे सेवन अधिक करावे. तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात डाळ भाज्या, भाकरी आणि कमी मसाले असलेल्या भाज्या खाव्यात. बाळंतपणानंतर काही महिने जेवणात ओव्याचा वापर करावा. कारण ओव्यामध्ये थायमेल नावाचा अँटिऑक्सिडंट असतो. यामुळे शरीराची स्वच्छताही होते. ओव्याचे पाणीदेखील प्यायल्यास त्यामुळे अनेक फायदे होतात. बाळंतपणानंतर बहुतांश महिलांना मलावरोधाचा त्रास होतो. त्यामुळे पेय पदार्थांचे भरपूर सेवन करावे. अशावेळी भरपूर फायबर असलेल्या खाद्य पदार्थांचे म्हणजेच सर्व प्रकारच्या धान्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ आणि भाज्यांचे जास्त सेवन केले पाहिजे.