आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराचे संपूर्ण तंत्र हे पोटाच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते . अपचना सारख्या किरकोळ समस्यांपासून पोटाच्या मोठ्या आजारांना बळी पडायचे नसेन तर केवळ पोटाचे घड्याळ सेट करा म्हणजे भविष्यात पथ्य आणि औषधांचे घड्याळ सेट करावे लागणार नाही .
आजकाल नोकरी करणाऱ्यांमध्येच नाही तर अगदी गृहिणींमध्ये देखील पोटाच्या तक्रारी आढळून येत आहेत. अर्थात या तक्रारी सध्याच्या भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे आणि अस्वच्छतेमुळे देखील निर्माण होतात. परंतु योग्य वेळेत योग्य अन्न सेवन केल्याने ९० % पोटाच्या तक्रारी संपतील. म्हणूनच पचनतंत्र सुरळीत करण्यासाठी अशा पद्धतीने वेळ पाळा.
सकाळचे जेवण असावे राजासारखे , दुपारचे जेवण असावे युवराजासारखे , आणि रात्रीचे जेवण असावे गरिबासारखे असे तंत्र जुनी पिढी सांगून गेली. पण आज मात्र हे पूर्णपणे उलटेच होते आहे . परिणामी या समस्या निर्माण होतात. सकाळी उठल्यानंतर लगेचच उपाशी पोटी चहा घेऊ नये. उठल्यानंतर प्रथम एक ग्लास पाणी प्यावे. पाणी नेहमी बसून शांतपणे प्यावे. चहा नेहमी बिस्कीट, खारी सोबत घ्यावा .व्यायाम आणि अंघोळी नंतरच सकाळचे जेवण हे ८ ते ११ च्या दरम्यान करावे. जेवण करून अंघोळ करू नये. असे केल्यास बीपीचा त्रास उद्भवू शकतो. जेवणाच्या अर्धा तास आधी भरपूर पाणी प्यावे. जेवताना आणि जेवण झाल्यानंतर तहान शमण्यापुरतेच पाणी प्यावे.
सकाळी जो नाश्ता केला जातो तो नेहमी राजा सारखा असावा, ज्या आहारामध्ये हिरव्या भाज्या, कडधान्ये, दूध, तूप, सुका मेवा, फळे यांचा समावेश असावा. दुपारचे जेवण हे युवराजासारखे असावे. भाजी, पोळी, मासे, वारण – भात यासह दुपारी सलाड, ताक, दही, सोलकढी, यांचा समावेश केल्यास उत्तम. दुपारचे जेवण हे १ ते ३ च्या दरम्यान करावे. सायंकाळचे जेवण मात्र गरीब सारखे असावे. भाजी आणि पोळी सायंकाळच्या जेवणात असावी. भाताचा मात्र रात्री जेवणात समावेश टाळावा. सायंकाळचे जेवण ७ ते ९ च्या दरम्यान करावे.
काही सोपे मात्र महत्वाचे नियम
* रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करावी . लगेचच झोपू नये .
* शरीराच्या वजनानुसार पाणी प्यावे . पाणी देखील प्रमाणात आणि मुख्य म्हणजे नेहमी बसून प्यावे .
* जेवण झाल्या नंतर बडीशेप , शोपा , खाल्यान्ने पचनास मदत होते . झोपताना छोटा गुळाचा खडा झाल्यानेही उपयोग होईल .
* रात्री कोणतेही फळ खाऊ नये .
* झोपताना डाव्या कुशीवर झोपावे . कमीत कमी ८ तास झोप घेणे शरीरासाठी आवश्यक आहे .
* पोटावर झोपणे टाळावे .
* आठवड्यातून एकदाच चिकन, मटण यांचा समावेश असावा. पचायला जड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ पचायला जड असल्याने रात्री आहारात घेणे टाळावे
* सकाळी व्यायाम करावाच , १५ मी मोकळ्या हवेत चालायाला जाणे उत्तम .