आरोग्यानामा ऑनलाइन टीम : उपवास करणे फायद्याचे असल्याचे संशोधनातही आढळून आले आहे. पण, उपवास करण्याचे सुद्धा काही नियम आहेत. चुकीच्या पद्धतीने उपवास केल्यास नुकसानही होऊ शकते. काही आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी उपवास करणे, योग्य नसल्याचे सांगितले जाते. उपवास कुणी करू नये, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१ उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी उपवास केला तर त्यांची बॉडी सिस्टम बिघडू शकते. त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
२ नुकतीच सर्जरी झालेल्यांनी उपवास करू नये. सर्जरी झाल्यानंतर जखम सुकण्यासाठी बॉडीला आवश्यक व्हिटामिन आणि मिनरल्सची गरज असते.
३ रक्ताची कमतरता असल्यास उपवास करू नये. उपवास केल्यास कमजोरी आणि थकवा अधिक जाणवू शकतो.
४ हृदयरोगाचे रूग्ण जास्त वेळ उपाशी राहिले तर त्यांच्या शरिराची सिस्टम बिघडू शकते.
५ लंग्समध्ये काही त्रास असेल तर उपवास करू नये. याने त्रास अधिक वाढू शकतो.
६ ब्रेस्ट फिडींग करणाऱ्या महिलांनीही उपवास करू नये. यामुळे मुलांना आवश्यक ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत नाहीत.
७ मधुमेहाच्या रूग्णांनी वेळेवर जेवण करणे, औषध घेणे गरजेचे असते. त्यांनी उपवास केल्यास मोठा फटका बसू शकतो.
८ गरोदर महिलांना सतत व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज असते. अशा महिलांनी उपवास केल्यास ती महिला आणि तिच्या बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Visit : arogyanama.com