आरोग्यानामा ऑनलाईन टीम : केवळ जिम करून वजन नियंत्रणात राहिल असे नाही, तर त्यासाठी आहाराचे काही नियम पाळणे खुप गरजेचे असते. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्हाला वेळ काढून सकाळचा नाश्ता केलाच पाहिजे. तब्येतीसाठी हे चांगले असून काही आजार सुद्धा यामुळे दूर राहतील. सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा आहे, हे जाणून घेवूयात.
लक्षात ठेवा
१ सकाळचा नाश्ता टाळू नका.
२ थेट दुपारचे जेवण करणे ही फार मोठी चूक आहे.
३ भरपेट नाश्ता करूनच घराबाहेर पडले पाहिजे.
४ नाश्ता टाळल्यामुळे वजन कमी करणे अवघड होऊन बसेल.
५ जास्त कॅलरीजयुक्त फास्ट फूडकडे ओढले जाल.
६ भूक असो अथवा नसो, सकाळी व्यववस्थित नाश्ता कराच.
Visit : arogyanama.com