आरोग्यनामा ऑनलाइन – अयोग्य आहारामुळे आरोग्य नेहमी धोक्यात येते. निरोगी शरीरासाठी चांगला आहार घेणे खूप महत्वाचे असते. यासाठी आहारात योग्य पदार्थांचा समावेश करावा, आहार पचण्यास हलका असावा, खूप गरम पदार्थ खावू नयेत, उशिरा पचणारे पदार्थ टाळावेत, अशी काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा विविध प्रकारच्या व्याधी होऊ शकतात.
हे ध्यानात ठेवा
* वजन कमी करण्यासाठी घास कमीत-कमी ३०-३५ वेळेस चावून खा. पौष्टिक आणि संतुलित आहार घेताना लोक घाई केल्यास अन्न पचत नाही.
* दिवसभरात वेळेवर योग्य आहार घेतल्यास पचनक्रिया संतुलित राहते. सकाळी नाश्ता केल्यास पचनक्रिया चांगली राहते.
* जेवतांना पाणी प्यायल्यास पचनक्रियेवर प्रभाव पडतो. यामुळे जेवणाच्या अर्धा किंवा एक तास अगोदर पाणी पिऊन घ्यावे.
* वर्कआउट किंवा व्यायाम केल्यानंतर लगेच जेवण करू नये. शरीराला सामान्य तापमानावर येऊ द्यावे, त्यानंतरच जेवण करावे.
* खाल्लेले अन्न पचत नाही तोपर्यंतच लगेच दुसरे खावू नये. यामुळे पोटाचे आजार होतात. लठ्ठपणा वाढू लागतो.
* जेवणामध्ये कमीतकमी ६ तासांचे अतंर असावे. रात्रीचे जेवण पचण्यास वेळ लागतो, यामुळे डिनर लवकर करावे. नियमितपणे वेळेवर दिवसातून तीन वेळेस जेवण केल्यास एकाग्रता वाढते.
* खाण्याच्या पद्धतीमध्ये बदल करून मधुमेहापासून दूर राहणे शक्य आहे. हळूहळू आणि चावून खाल्ल्याने ग्लुकोज तयार होण्याचे कार्य दुप्पट गतीने होते. यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.
* जेवण करण्यापूर्वी दोन्ही हात चांगल्या पद्धतीने धुवून घ्यावेत. यामुळे हातावरील किटाणू नष्ट होतात.
* जमिनीवर बसून जेवण करावे. जमिनीवर बसून जेवण करणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे.