आरोग्यनामा ऑनलाईन – तुम्ही अनेकदा कामाच्या गडबडीमध्ये नाश्ता करायचे विसरता किंवा चालता चालता एखादे फळ खाता. नाश्ता न केल्यामुळे अनेकांना सवय असते फळे खाण्याची. फळ हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते पण तुम्हाला माहित आहे का काही फळे आपल्या शरीरासाठी घातक असतात. जी तुम्हाला नुकसान पोहचवू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. जर तुम्हाला सकाळी फळं खाण्याची सवय असेल तर हे जाणून घ्या की, कोणती फळं खावी आणि कोणते खावू नये.
केळ
अनेक लोकांना वाटते की, केळ खाल्याने आपले आरोग्य चांगले राहते. सकाळी रिकाम्या पोटी केळ खाल्याने आपले आरोग्य बिघडू शकते कारण केळामध्ये मॅग्नेशिअम असते. जे रिकाम्या पोटी खाल्याने रक्तामध्ये तेजीने मॅग्नेशिअमची मात्रा वाढते त्यामुळे तुम्ही हृदयाच्या आजाराचे शिकार होतात.
द्राक्षे
द्राक्षे एक साइट्रस फळ आहे. ज्यामध्ये कि अॅसिड असते. हे जर रिकाम्या पोटी खाल्ले तर पोटामध्ये आग होते आणि गॅस बनण्यासोबतच हार्ट अटॅकची समस्या वाढते याव्यतिरिक्त जर सकाळी रिकाम्या पोटी द्राक्षांचे सेवन केले तर व्यक्ती गॅस्ट्रिक अल्सरचे शिकार होऊ शकतात.
आंबा
काही फळे असे असतात जे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर ते ब्लड शुगर वाढविते. ज्यामुळे डायबेटीजची समस्या वाढते. आंबा सकाळी रिकाम्या पोटी खाल्ला तर आपल्या शरीराला ते नुकसान पोहचवू शकतात.
नाशपाती
अनेक लोक वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करीत असतात. असेच नाशपाती आहे जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. याला डाएटमध्ये सहभागी करुन वजन कमी करण्याबरोबरच आजारही दूर होण्यास मदत होते.
लीची
जर तुम्हाला लीची खाणे पसंत आहे तर लक्षात ठेवा की, रिकाम्या पोटी लीचीचे सेवन करु नये. असे करणे डायरेक्ट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. लीचीमध्ये प्राकृतिक रुपाने हायपोग्लिसीन-ए आणि मिथेलीन सायक्लोप्रोपाइल ग्लायसीन नावाचे तत्व असते. जे शरीरामध्ये फॅटी अॅसिड मेटाबॉलिझममध्ये अडचण निर्माण करते. यामुळे रिकाम्या पोटी लीचीच्या सेवनामुळे ब्लड शुगर लेवल कमी होते. त्यामुळे ताप, उल्टी, बेशुद्ध यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.