आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Hhealth News | उन्हाळ्याच्या काळात अनेकदा आपल्याला खाण्या- पिण्याची इच्छा होत नाही. परंतु यामुळे डिहाइड्रेशन होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी आपण दररोजच्या आहारात काही फळांचा समावेश करू शकता. फळांमध्ये पौष्टिक आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात आणि ते मोठ्या प्रमाणात पाण्याने भरलेले असतात.ते घेतल्याने डिहायड्रेशन टाळता येऊ शकते. याव्यतिरिक्त रोग प्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका देखील कमी होईल. तर मग जाणून घेऊया त्या फळांबद्दल. (Hhealth News)
१) आंबा
आंबा जवळजवळ प्रत्येकाचे आवडते फळ आहे. उन्हाळ्यात मिळणारे हे फळ लोक मोठ्या उत्साहाने खातात. त्यात पोषक तत्वांसोबत ८६ टक्के पाणी असते. हे घेतल्याने शरीरात पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होते. याशिवाय रोगप्रतिकार शक्ती तीव्र होते आणि आजारापासून संरक्षण होते.
२) खरबूज
उन्हाळ्यात खरबूज हे आंब्याच्या बरोबरिने खाल्ले जाते. त्यात व्हिटॅमिन आणि खनिजांसोबत ९५ टक्के पाणी असते. शरीरात पाण्याची कमतरता त्याच्या सेवनाने पूर्ण होते.
३) नारळ पाणी
निरोगी राहण्यासाठी नारळपाण्याचे सेवन करणे उत्तम मानले जाते. यात व्हिटॅमिन, कॅल्शियम, फायबर आणि इतर पोषक द्रव्यांसोबत अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. हे शरीराला पोषण प्रदान करते आणि डिहायड्रेशनच्या समस्येपासून मुक्त करते. तसेच रोग प्रतिकारशक्ती आणि पाचक प्रणाली मजबूत आहे.
४) टरबूज
टरबूज एक हंगामी फळ आहे. हे फळ चवदार आणि पौष्टिक पदार्थांनी समृद्ध आहे.
त्यात ९० टक्के पाणी असण्याने दिवसभर शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
याशिवाय हे सेवन केल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते तसेच चेहऱ्यावर चमक येते.
५) सफरचंद
सफरचंद पोषक आणि अँटी-ऑक्सिडंट्स समृद्ध असते.
त्यामध्ये सुमारे ८६ टक्के पाणी असते.
सफरचंद खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते तसेच डिहायड्रेशनची समस्या टाळली जाते.
डॉक्टर दिवसातून १ सफरचंद खाण्याची देखील शिफारस करतात.