आरोग्यनामा ऑनलाईन टीम – डाळिंब हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डाळिंब खाल्याने अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येते. पूर्वी भारतात अफगाणिस्तानातून डाळींब येत असत. पण आता महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात विशेषत: महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या सोलापूर, नगर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात डाळिंबाची लागवड मोठया प्रमाणावर केली जात आहे. डाळिंबामध्ये व्हिटामिन्स ए, सी, ई, बरोबरच फ्लोरीक अॅसीड या रासायनिक घटका बरोबराच अँटी ऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात आहेत .
१) डाळिंबामध्ये कर्करोग प्रतिबंधक द्रव्ये असून ते फायटो केमिकल्स्ने युक्त असते. त्यामुळे कर्करोगाच्या बाबतीत डाळींब गुणकारी आहे.
२) डाळींब खाल्याने हृदय मजबूत होते.
३) डाळिंबातील काही महत्वाच्या द्रव्यांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
४) शरीरामध्ये कर्करोगांच्या पेशींची होणारी वाढ डाळिंबामुळे रोखली जाते. काही कर्करोगांच्या पेशी डाळिंबामुळे मरतात सुद्धा असा काही लोकांचा दावा आहे.
५) वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा डाळिंबाचा उपयोग होतो, कारण डाळिंबात भरपूर फायबर्स आणि व्हिटॅमिन्स असतात.
६) डाळिंबाच्या नित्य सेवनाने त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.
७) डाळिंबाच्या सेवनाने त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होतात.
८) दात किडला असेल डाळिंब खाल्ले तर याने डाळिंबाच्या किडीला प्रतिबंध होतो. आणि हिरड्या मजबूत होतात.