आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खरबूज हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम असे फळ आहे. यात भरपूर पोषण मूल्य असतात. यात पाणी, जीवनसत्त्वे आणि क्षाराचे प्रमाण ९५ टक्के असते. यामुळे अनेक आजार दूर राहतात. हे थंड गुणाचे फळ असल्याने विशेषकरून उन्हाळ्यात याचे सेवन अधिक लाभदायक ठरते. खरबूज नियमित खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका तसेच किडनी खराब होण्याचा धोका टाळला जाऊ शकतो.
हे आहे फायदे
१) यातील एंडीनोसीन तत्त्वामुळे रक्ताची गुठळी होत नाही. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो. हे नियमित खाल्ल्याने हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो.
२) किडनीची समस्या असल्यास याचे दरारोज सेवन करावे. लिंबाच्या रसाबरोबर सेवन युरिक अॅसिडशी संबंधित समस्या दूर होतात.
३) नितळत्वचेसाठी खरबूज लाभदायक असून यामध्ये कोलाजेन तत्व असल्याने त्वचा निरोगी व सुदंर होते. यातील पाणी त्वचेचा कोरडेपणा नष्ट करते.
४) यातील पाणी अॅसिडिटीची समस्या होऊ देत नाही. यातील क्षार चयापचय संस्था उत्तम ठेवतात.
५) यातील कॅरिटीनॉयड कर्करोगापासून बचाव करते.
६) खरबुजातील बिया कर्करोगावर खूपच फायदेशीर ठरल्या आहेत