आरोग्यानामा ऑनलाइन टीम : अॅसिडीटीमुळे छातीत जळजळ, मळमळ, नॉशिया, भूक न लागणे, उलट्या होणे, पोटात दुखणे, डोकेदुखी असे अनेक प्रकारचे त्रास होतात. या समस्येची विविध कारणे आहेत. त्यापैकी काही कारणे ही स्वभावशी संबंधीत आहेत. कधी-कधी परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आपण राग शांत करतो, मन मारून एखादी गोष्ट करतो, संताप गिळतो, याचा परिणाम शरीरावर होत असतो. यामुळे सुद्धा अॅसिडीटी होऊ शकते. अशावेळी औषधांचाही काही खास परिणाम दिसून येत नाही. म्हणून अॅसिडीटी झाली असेल तर त्याच्या मुळाशी गेले पाहिजे. हे मुळ शोधले तर आपोआपच अॅसिडीटीवर नियंत्रण मिळवता येते.
ही आहेत कारणे
व्यायाम न करणे
व्यायाम न करणे, दिवसभर बैठे काम करणे, खुप खाणे, शरीराची हालचाल अत्यंत कमी असणे, या कारणांमुळे सुद्धा अॅसिडीटी होते.
मन मोकळं करा
मनातल्या मनात कुढत बसल्याने त्याचा शरीरावर परिणाम होतो. म्हणून कुणाकडे तरी मनमोकळं करावं. मनातल्या मनता कुढत बसल्यास, जळफळाट करत बसल्यास पित्त खवळते.
चिडचिडा स्वभाव
खूप चिडचिडा स्वभाव असल्यास अॅसिडीटी होऊ शकते. जास्त राग येत असला तरी अॅसिडीटी वाढते. शिवाय अॅसिडीटी वाढली तरी खूप राग येतो.
जेवणाची वेळ, प्रमाण
कोणत्याही वेळी जेवण करणे, दोन जेवणात जास्त अंतर, जास्त प्रमाणात जेवणे, या कारणांमुळेही अॅसिडीटी होते.
मसालेदार जेवण
अती मसालेदार, चमचमीत पदार्थ, सोडायुक्त पेय यामुळे अॅसिडीटी वाढते.
Visit : arogyanama.com