आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळा हा सगळ्यांचाच आवडीचा ऋतू असतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण या ऋतूची वाट पाहत असतात. पण या पावसाळ्यात आजरही उदभवतात. म्हणून कधी कधी चीड चिडचिडही होते. कारण या पावसाळ्यात होणारे आजार. चला तर मग जाणून घेऊ घरच्या घरी कशा प्रकारे या आजारांवर मात करता येते,
पावसाळ्यात जुलाब होण्याची शक्यता जास्त असते. अशा आजारावर उपाय म्हणून तुम्ही संजीवनी वटीचा उपयोग करू शकता. ज्यांना पचनात अडचण निर्माण होते त्यांनी पावसाळ्याच्या दिवसात जेवणापूर्वी लिंबाच्या रसातून संजीवनी वटी घेतल्याने या त्रासापासून सुटका मिळू शकतो. पावसाळ्यात शक्यतो पेढा, बर्फी अशा प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ खायचेच असेल तर खात्रीच्या दुकानातूनच घ्यावे. तर उघड्यावरचे अन्न कटाक्षाने टाळावे.
पावसाळ्यात सगळ्यात जास्त महत्त्वाची काळजी घ्यायची असेल तर ते म्हणजे पाणी. पावसाळ्यात होणारे आजार हे दूषित पाण्यामुळेच होतात. तर अशात पावसाळ्यात पाणी उकळलेले गरम पाणी प्यावे. हे पावसाळ्यातील सर्वांत मोठे पथ्य आहे. बाहेर जाताना नेहमी पाणी घेऊन जावे. बाहेरचे पाणी पिणे पूर्ण पणे टाळा.
पावसाळ्यात गरम गरम चहा सगळ्यांनाच आवडतो . तर अशा या चहाला नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवून तुम्ही निरोगी राहू शकता. रोजच्या चहामध्ये गवती चहा, आले, पुदिना यांचा वापर करावा. तसेच सुंठाचे चुर्ण, गूळ व तूप यापासून बनविलेल्या गोळ्या पावसाळ्यात उपयोगी ठरतात.
तसेच पावसाळ्यात मच्छरांचे प्रमाण वाढते, तर यापासून बचाव करण्यासाठी उपाय करा. तसेच शिंका, खोकला वगैरे त्रास सुरू झाल्यास ताबडतोब उपचार करून घ्या.