आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गोड पदार्थ हा लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ असतो. पण भरपूर लोकांना नेहमी गोड पदार्थ खाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. पण यामुळे तुम्हचे आरोग्य बिघडते हे तुम्हाला ठाऊक आहे का ? गोड पदार्थ खाल्या नंतर लगेच पाणी पिल्याने तुमच्या शरीरातील शुगर लेव्हल वाढू शकतो. आणि जर तुम्ही गोड पदार्थ खाल्या नंतर पाणी नाही प्यालात तर तुम्हची शुगर लेव्हल कायम राहू शकते.
दक्षिण अमेरिकेच्या एका संशोधनात अभ्यास केले असता हा निष्कर्ष समोर आला आहे. आपण गोड पदार्थ खाल्या मुळे आपल्या शरीरात शुगर सगळी कडे पसरलेले असते आणि अशात जर आपण पाणी पिले तर हा शुगर पाण्यात मिसळून आपला शुगर लेव्हल वाढतो. म्हणूनच नेहमी गोड पदार्थ केल्यानंतर पाणी पिणे टाळावे.
– जर गोड पदार्थ खाल्यानंतर तुम्हाला पाणी पिण्याची इच्छा झाली तर काही तिखट पदार्थ खा ज्यामुळे पाणी पिण्याची इच्छा होत नाही.
– नेहमी लक्षत ठेवा तुम्ही जेव्हा केव्हाही गोड पदार्थ ख्याल तेव्हा नक्की चूळ भरा.
– जर तुम्हाला नेहमी गोड पदार्थ खायची इच्छा झाली तर अशा वेळी फळे खाणे उत्तम असते.
– गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्याने चॉकलेट आणि टॉफी खाण्या ऐवजी तुम्ही फळे खाऊ शकता.
– शक्यतो नेहमी मिल्कशेक किंवा कोल्ड कॉफीच्या ऐवजी फळांचा ज्यूस प्या.