आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीरासाठी पाणी हा घटक खुप आवश्यक आहे. पाण्याशिवाय शरीराची कोणतीही क्रिया व्यवस्थित सुरू राहू शकत नाही. मुळात पाण्याशिवाय मनुष्य जिवंतच राहू शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हटले जाते. दिवसातील काही ठराविक वेळी शरीराला पाण्याची खुप आवश्यकता असते. यावेळेस पाणी प्यायल्यास विविध फायदे होतात. पाणी पिण्याच्या या वेळा कोणत्या याविषयी जाणून घेवूयात.
१) भूक लागल्यास
भूक लागल्यास एका ग्लास पाणी प्यावे. अनेकांना तहान लागलेली असताना भुख लागल्याचे जाणवते. यामुळे जेवतानाही शरीरात जास्त कॅलरी जात नाहीत.
२) आजारी असल्यास
आजारी असल्यास जास्त पाणी प्यावे. आजारी असताना पाणी पिल्याने रूग्ण लवकर बरा होतो.
३) विषाणुग्रस्त ठिकाण
हॉस्पिटल, भरपूर आजारी लोक असलेले ठिकाण, असेल तर अशा ठिकाणी आपल्याकडील एक ग्लास स्वच्छ पाणी प्यावे. यामुळे शरीराला व्हायरस आणि विषाणूंना दूर ठेवण्याची ताकद मिळते. शरीरात पाणी भरपूर असेल तर विषाणूंना शरीरात विरोध करते.
थकवा असल्यास
थकाव जाणवत असल्यास पाणी प्यावे. हे डिहायडरेशनचे लक्षण असू शकते. पाणी मेंदूपर्यंत जाऊन आपल्यास शरीराला उर्जा देते.
सकाळी उठल्यानंतर
सकाळी उठल्यानंतर एक ग्लास थंड पाणी पिल्याने शरीर कार्यान्वित होते. अॅक्टीव्ह होण्याची वेळ असल्याचे यामुळे शरीराला जाणवते.
खाण्यापुर्वी
जेवणापुर्वी नेहमी पाणी प्यावे. यामुळे जेवणही कमी जाते. तसेच शरीरात पाणी असल्याने जेवणही चांगले जाते.
वर्कआउट करण्यापूर्वी व नंतर
वर्कआउटपूर्वी आणि नंतर पाणी प्यावे. यामुळे शरीरातून बाहेर पडलेल्या पाण्याची भरपाई होते. मात्र, वर्कआउटनंतर लगेचच भरपूर प्रमाणात पाणी पिऊ नका.