आरोग्यानामा ऑनलाइन टीम : अति साखर खाण्याने लहान मुलांची तब्येत सारखी बिघडू शकते. तसेच मोठ्यांना सुद्धा या सवयीमुळे विविध आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच सातत गोड खाण्याचा मोह आवरायला पाहिजे. सतत गोड खाण्याची सवय लागण्याची काही कारणे आपण जाणून घेणार आहोत.
ही आहेत कारणे
१ सतत गोड खाण्याची इच्छा होत असल्यास सी व्हेजिटेबल खावे. यात खनिजे भरपूर असल्याने गोड खाण्याची इच्छा होणार नाही.
२ शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास साखर खावीशी वाटते. त्यामुळे शरीर डिहायड्रेटेड राहाणार नाही, याकडे लक्ष द्या.
३ बराच वेळ उपाशी राहण्याची सवय असेल तर शरीर साखरेची मागणी करते. म्हणून शरीराला जेवढ्या अन्नाची गरज आहे, तेवढे अन्न दिवसात पाच-सहा वेळा विभागून खा.
हे लक्षात ठेवा
* शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याकडे दुर्लक्ष करणे.
* चांगल्या आरोग्यासाठी सुरुवातीपासूनच अति गोड खाण्यावर नियंत्रण ठेवा.
Visit : arogyanama.com