आरोग्यनामा ऑनलाइन टीम- जीवनात रंगांचे विशेष महत्व असून या रंगांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो, असे प्राचीन ग्रंथांमध्ये नमूद करण्यात आले आहे. रंगांशिवाय जीवन निरस होते. काही धर्म ग्रंथ व शास्त्रामध्ये रंगाच्या महत्वाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये रंगांमुळे जीवनावर होणारे परिणाम, आरोग्यावर होणारे परिणाम सांगण्यात आले आहेत. अशाच प्रकारे विविध रंगाच्या काचेच्या बाटल्यांमधील पाणी विशिष्ट पद्धतीने सेवन केल्यास अनेक आजार दूर करता येतात, असे काही प्राचीन ग्रंथात म्हटले आहे.
अशा रंगीत बाटल्यांमधील पाण्याच्या माध्यमातून कॅन्सर, कंबर दुखी, ताप, लिव्हर, हृदयरोग, पोटाचे रोग इत्यादी आजारांवर उपचार केले जाऊ शकतात, असे प्राचीन ग्रंथामध्ये म्हटले आहे. हा उपाय करण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या काचेच्या बाटल्या घ्या. त्या बाटल्या स्वच्छ धुवून वाळवून घ्याव्यात. आता या बाटल्यांमध्ये शुद्ध, स्वच्छ पाणी भरावे. दिवसभर या बाटल्या भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या जागेवर ठेवाव्यात. सूर्याच्या किरणांमुळे काचेच्या रंगाचा प्रभाव त्या बाटलीतील पाण्यावर पडतो.
हे पाणी पिल्याने आजार दूर होतात.कोणत्या रंगाच्या बाटलीतील पाणी कोणत्या आजारावर उपयुक्त आहे, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. हिरव्या रंगाच्या बाटलीतील पाण्याने कॅन्सर, नपुंसकता, ज्वर, कंबर दुखी हे आजार दूर होतात. हे पाणी अल्सर व इतर गुप्त रोगांमध्ये लाभदायक ठरते. तर पिवळ्या रंगाच्या बाटलीतील पाण्याने शरीरावरील सूज कमी होते. तसेच लिव्हर, पोटाचे आजार व शरीरातील उष्णता कमी होते. लाल रंगाच्या बाटलीतील पाण्याने रक्ताशी संबंधित आजार दूर होतात. हृदयरोगच्या सबंधित आजारांवरही या रंगाच्या बाटलीतील पाणी उपयुक्त आहे.
तसेच निळ्या रंगाच्या बाटलीतील पाण्याने डोक्याचे आजार, ताप, उत्तेजना कमी होण्यास मदत होते. जांभळ्या रंगाच्या बाटलीतील पाण्याने नव्र्हस सिस्टम चांगली होते आणि पोटाचे आजार बरे होतात, असे काही प्राचीन ग्रंथांमध्ये नमूद करण्यात आले आहे.