आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पाण्यात भिजत घातलेले हरभरे काढल्यानंतर उरलेल्या पिवळसर पाण्यात अनेक न्यूट्रियंट्स असतात. यामुळे अनेक आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. मात्र, हरभऱ्याचे पाणी दीर्घकाळ ठेवल्यास यामध्ये बॅक्टेरिया तयार होऊ शकतात. रात्री हरभरे पाण्यात भिजवावेत आणि हे पाणी सकाळी प्यावे. रोज एक ग्लास हे हरभऱ्याचे पाणी प्यायल्यास अनेक फायदे होतात.
हरभऱ्याच्या पाण्यामध्ये असलेल्या आयर्नमुळे अशक्तपणा दूर होतो. हे पाणी प्यायल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते. यामुळे हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो. यामध्ये प्रोटीन भरपूर असल्याने स्नायू मजबूत होतात.
हरभऱ्याच्या पाण्यात भरपूर फायबर्स असतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते. यामध्ये झिंक, कॉपर असते. यामुळे केस गळती थांबते. शिवाय चेहऱ्याची चमक वाढते. हरभऱ्याच्या पाण्यात लघवीचे प्रमाण वाढवणारे घटक असतात. हे लघवीच्या समस्येपासून बचाव करते. हरभऱ्याच्या पाण्यात फॉस्फरस असते. यामुळे दात मजबूत होतात. गम समस्येपासून बचाव होतो. तसेच हरभऱ्याच्या पाण्यात लघवीचे प्रमाण वाढवणारे घटक असतात. हे लघवीच्या समस्येपासून बचाव करते. शिवाय या पाण्यात फॉस्फरस असल्याने दात मजबूत होतात. गम समस्येपासून बचाव होतो.