आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आज बहुतांश लोक हे प्लॅस्टिक बॉटलमधून पाणी पिताना आढळून येतात. शाळा, कॉलेज, ऑफिस, बाहेर फिरायला जाताना प्लॅस्टिक बॉटलमधून पाणी नेले जाते. परंतु, प्लॅस्टिक हे शरीर तसेच पर्यावरणासाठी अतिशय हानिकारक आहे.
हे आहेत धोके
१) प्लॅस्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते.
२) लेबल असलेली बाटली फक्त एका वापरासाठी सुरक्षित असते. सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.
३) पृथ्वीवर जेवढी संख्या माणसांची आहे त्यापेक्षा जास्त जिवाणू एका माणसाच्या तोंडात असतात. त्यामुळे इतरांनी वापरलेल्या बाटलीतून पाणी पिण्यास टाळावे.
४) पॉलीथिलीन आणि पॉलीप्रॉपिलीनने बनलेल्या बाटल्या अनेक वापरांसाठी उपयुक्त आहेत. पण जर त्यात नेहमी थंड पाणी साठवून ठेवले आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक केले तरच त्या सुरक्षित असतात.
५) बाटली नेहमी कोमट पाणी, विनेगर किंवा अँटीबॅक्टेरिअल माऊथवॉशने स्वच्छ करा.
६) मिनरल वॉटर घेतल्यानंतर तुम्ही त्या बाटलीचा पुनर्वापर करत असाल तर ते चुकीचे आहे.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)