आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जेवन केल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. उन्हाळ्यात तर बहुतांश लोक जेवणानंतर थंड पाणी पितात. थंड पाणी प्यायल्याने काहीकाळ बरे वाटत असले तरी ते शरीरासाठी हानिकारक आहे. या पाण्याचा आपल्या पचनक्रियेवर परिणाम झाल्याने विविध विकारांसह रोग प्रतिकारशक्ती कमी होते.
का आहे घातक
* हे पित्ताशयासाठी हानिकारक आहे.
* शरीराचा सामान्य तापमान ९८.६ डिग्री फॉरेनहाइट म्हणजेच ३७ डिग्री सेल्सियस असते.
* शरीरासाठी २० ते २२ डिग्री सेल्सियस तापमानाचे पाणी आवश्यक असते. यापेक्षा थंड पाणी पिणे हानिकारक आहे.
हे आहेत दुष्परिणाम
बद्धकोष्ठता
यामुळे पाचक रसाचे तापमान कमी होऊन जेवणाचे पचन व्यवस्थित होत नाही. आतडया सुद्धा संकुचित होतात. यामुळे बद्धकोष्ठता होते.
टॉन्सिल्स
अधिक वेळेपर्यंत गार पाणी पित राहिल्याने टॉन्सिल्सची समस्या होते.