आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही दिवसांपूर्वी यो यो डाएटची सर्वत्र खुपच चर्चा होती. या डाएटवर जगभर मते मांडण्यात येत होती. त्याच्या दुष्परिणामांविषयी सोशल मीडियावरही खुप चर्चा झाली. या डाएटने वेगाने वजन कमी होत असले तरी नंतर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होत असल्याचे दिसून येते.
यो यो डाएट
येल विद्यापीठातील डॉक्टर डी. ब्राऊनेल यांनी हे डाएट प्रथम मांडले. यात सुरुवातीला खूप कडक डाएट करायचे. अन्नत्याग करायचा. यामुळे वजन झटझट कमी होते.
वजन पुन्हा वेगाने वाढते
मानवी शरीराचे एक चक्र असते. वजनाचे असेच चक्र असून ते यो यो डाएटमुळे मोडले जाते. एकदम अन्नच नाकारल्याने वजन कमी होते. पण काही दिवसांनी तेवढे क्रॅश डाएट करणे शक्य नसते. भूक लागते. थोडे थोडे म्हणत खाणे सुरु होते. यामुळे वजन पुन्हा वेगाने वाढते. कमी झालेल्या वजनापेक्षा हे वजन वाढते.
शरीराचे चक्र बिघडते
वजन वेगाने घटणे अथवा वाढणे याचा परिणाम ह्दय, रक्तदाब, हार्मोन्सवर होतो. यामुळे शरीराचे चक्र बिघडून जाते.
पचन कायमचे बिघडते
यो यो डाएट करू नका, असे तज्ज्ञ सांगतात. अनेक तरुण मुली, विशेषता मॉडेल्स असे डाएट करतात. खाणे एकदम बंद केल्याने वजन कमी होते. पण पचन कायमचे बिघडते. पचनशक्तीवर परिणाम होवून शरीरात योग्य आवश्यक स्त्राव स्त्रवणे कमी होते.
एकाग्रतेवर परिणाम
यामुळे मूड बदलतो. चिडचिड होते. भूक लागल्याने डोकेदुखी सतावते. एकाग्रतेवर परिणाम होतो.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)