आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जे महत्वाचे दिवस आहेत ते आपल्या भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्याच महत्वाचं कारण असं की, या दिवसाचे महत्व लोकांना कळावे. आणि ज्या व्यक्तीने काही महान कार्य केलं आहे. त्या व्यक्तीचा गौरव म्हणून काही महत्वाचे दिवस साजरे केले जातात. त्यातीलच एक अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे डॉक्टर्स डे आजच्या दिवशी डॉक्टरांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. परंतु, हा दिवस साजरा करण्यामागे खूप मोठे कारण आहे. ते म्हणजे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांनी आयुष्यभर वैद्यकीय चिकिस्यक म्हणून जी रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांच्या कार्याची प्रेरणा इतर डॉक्टरांनी घ्यावी. आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून १ जुलै हा दिवस भारतभर डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.
आपण डॉक्टरांना देव मानतो. त्यांच्यवर विश्वास ठेऊनच आपण आपला जीव धोक्यात टाकून कोणत्याही अवघड शस्र्क्रियेसाठी तयार होतो. परंतु, सध्या अनेक मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून चांगली वागणूक दिली जात नाही. आणि अनेक रुग्णांना लुबाडले जाते. त्यामुळे सध्या डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहेत. पण आपण ज्यांना देव मानतो त्यांच्यावर असे हल्ले करणे योग्य नाही.
आणि डॉक्टरांनीही डॉ. रॉय यांचा आदर्श घेऊन रुग्णांची मनोभावे सेवा करणे गरजेचे आहे. खरे सांगायचे तर बी.सी रॉय यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजाप्रति सेवा अर्पण केली. ते डॉक्टर म्हणून वावरताना पैशाचा विचार न करता आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग करीत होते. धनापेक्षाही त्यांना मिळालेला सन्मान हा अधिक मोलाचा ठरतो.
त्यांच्यातली ही रुग्णसेवा विषयक भावना लक्षात घेतली तर त्यांचा जन्मदिवस डॉक्टर्स डे म्हणून पाळण्याऐवजी रुग्णसेवा दिन म्हणून पाळला गेला पाहिजे.
आज देशामध्ये किंवा जगात अनेक प्रकारचे डेज किंवा दिवस पाळले जातात. त्यात ह्रदयरोग दिन, मधुमेह दिन, अशा वेगळ्या नावानेही दिवस पाहायला मिळतात. परंतु कुठेही रुग्णसेवा दिन आढळून येत नाही.
याकरीता डॉक्टरांनीच पुढाकार घेऊन त्यांच्यामधल्या या रुग्णांविषयीची समर्पणशिलता सन्मानित करण्याकरीता रुग्णसेवा दिनाची मागणी केली पाहिजे. रुग्ण हा केंद्रबिंदू ठेवून संपूर्ण आरोग्य व्यवस्था किंवा त्यातल्या घटकांनी काम केले पाहिजे. पैसा मिळवणे हा व्यवसायाचा भाग असू शकतो. परंतु आरोग्यासारख्या अत्यंत भावनिक आणि संवेदनशिल क्षेत्रामध्ये सेवा आणि समर्पणालाच महत्त्व राहिले पाहिजे.