भिवंडी येथील रहिवाशी सौ.प्रमिला जुकार या गेल्या दोन वर्षापासून असहाय्य वेदनेपासून त्रस्त आणि बेडवर पडून होत्या. थोडही चालले तरी खूप दम लागणे, श्वास घेण्यास अडथळा, पायांना सुज येणे, अपचन आदी समस्यांनी बेजार झाल्या होत्या. विविध डॉक्टरांना भेटल्या तपासणीत पोटात मोठी गाठ असल्याचे निदान झाले. पंरतु शस्त्रक्रिया करण्यास तयार नव्हते कारण रूग्णाची खालावलेली शारिरीक स्थिती. नंतर त्यांना कल्याण येथील डॉ.तेजल खडकबाण, हॉली क्रॉस रूग्णालय यांना भेटण्याचा सल्ला दिला आणि त्या डॉक्टरांना भेटल्या.
डॉ.तेजल खडकबाण, सल्लागार कॅन्सर सर्जन म्हणाल्या की, ज्या स्थितीत सौ.प्रमिला माझ्याकडे आल्या त्यावेळी त्यांच्या पायांना सूज आली होती आणि पोट फुगलेले होते. त्या एक वाक्यही एका श्वासात पूर्ण करू शकत नव्हत्या आणि काही खातही नव्हत्या. त्वरीत सिटीस्कॅन करण्यात आले आणि गर्भाशयात मोठी गाठ असल्याचे निदान झाले. आम्ही त्वरीत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांची शारिरीक स्थिती पाहता अवघड स्थिती होती आणि अतिशय गुंतागुंतीच्या ४ तास चाललेल्या या शस्त्रक्रियेव्दारे ही गाठ काढण्यात आम्हाला यश आले. गर्भाशयातील डाव्या बाजूला असणारी गाठ २१ सेंमी लांब तर १० किलो वजनाची दुर्मिळच होती. या शस्त्रक्रियेत अॅनास्थेसियस्ट म्हणून डॉ.स्मिता शहा सोबत होत्या.
रूग्णाच्या नाजूक तब्येतीमुळे त्वरीत शस्त्रक्रिया करून ही गाठ पूर्णपणे काढण्यात आली, त्यानंतर एक आठवडयानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जर सौ. जुकार यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया केली नसती तर त्या कुपोषित किंवा हदयविकार अथवा श्वाशोच्छाच्या त्रास होण्याची शक्यता असल्याचे डॉ.खडकबाण यांनी सांगितले.
सौ.प्रमिला म्हणाल्या की, मी एक वर्षापुर्वी आंथरूणाला खिळून आणि श्वासही घेऊ शकत नव्हते वा जेवण ही जात नव्हते. मी माझ्या दैनंदिन दिनक्रमासाठी पुर्णतः माझ्या मुलगा आणि सुनेवर अवलंबून होते. मी डॉक्टरांची शतशा ऋणी आहे कारण त्यांच्यामुळे मला एक नवीन आयुष्य मिळाले असून मी आता पुर्णतः वेदनामुक्त आणि कोणताही त्रास मला होत नाही.