आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वेदनेकडे दुर्लक्ष करणे खूपच गंभीर आहे. काहीजण वेदना होत असतील तर ताबडतोब मेडिकल स्टोअर्समधून वेदनाशामक गोळी आणून ती घेतात. परंतु, वेदना कमी करण्यासाठी हा मार्ग खूप धोकादायक आहे. तज्ज्ञ सांगतात की, असा बेजबाबदारपणा धोकादायक ठरू शकतो. वेदनेमुळे केवळ दिवसातील कामात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून काहीजण वेदनाशामक गोळ्या घेतात. शरीराच्या कोणत्याही भागास वेदना झाल्यामुळे दिवसभराच्या कार्यपद्धतीवर परिणाम होतो. याशिवाय स्नायू कमकुवत आणि आखडण्याबरोबरच इतर गंभीर समस्यांना निमंत्रण मिळू शकते. लोक नेहमीच व्यग्र असल्याने अशा काही चुका करतात, ज्यामुळे पीडिताची स्थिती आणखी बिघडू शकते.
खिन्न राहणाऱ्या लोकांपैकी केवळ एक-तृतीयांश लोकच अँटीडिप्रेसेंट म्हणजेच डिप्रेशनमध्ये घेतले जाणारे औषध घेतात,असे एका संशोधनात आढळले आहे. याबाबत केलेल्या संशोधनात सामील झालेल्या लोकांचे ब्रेन स्कॅन करण्यात आले. भावनात्मक उलथापालथ वेदना आणखी वाढवू शकते, असे या संशोधनात आढळले आहे. ५४ टक्के लोक तणावग्रस्त राहिल्याने पाठदुखीनेही पीडित असतात. झोप येत नाही, उदासवाणे वाटते, वजन वेगाने वाढणे किंवा घटणे ही लक्षणे आढळल्यास डिप्रेशनने पीडित असल्याचे समजावे. अशी समस्या जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे. अँटीडिप्रेसेंट, काँगनिटिव्ह बिहेव्हिएरल थेरपी (सीबीटी) किंवा दोन्ही घेण्याचा सल्ला अशा वेळी डॉक्टर देऊ शकतात. सीबीटीमध्ये पीडित व्यक्तीस वेदनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मानसिकदृष्ट्या कणखर राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. जे दैनंदिन व्यायाम करत नाहीत, त्यांना नेहमीच शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागात वेदनेची समस्या जाणवते. व्यायामामुळे स्नायू बळकट होतात आणि सांध्यांची लवचीकता टिकून राहते. त्यामुळे एंडोर्फिन हार्मोनची सक्रियताही वाढते, जो मन:स्थिती चांगली करण्यात फायदेशीर ठरतो. गाठी व आर्थरायटिसने पीडित व्यक्तीच्या सांध्याची सूज कमी करण्यातही हे हार्मोन उपयुक्त आहेत.
व्यायामास एकदम सुरुवात करू नये. हळूहळू व्यायामास सुरुवात करावी. ५-१० मिनिटे चालावे. त्यामुळे सांध्यांची सक्रियता कायम राहील आणि त्यात वेदना किंवा आखडण्याची समस्या बंद होईल. एका संशोधनानुसार, चारपैकी एक पीडित वेदनेकडे दुर्लक्ष करतो आणि जवळपास सहा महिने उपचारास टाळाटाळ करतो. अमेरिकन पेन सोसायटीने म्हटल्यानुसार, बहुतेक लोक वेदना झाल्यानंतर डॉक्टरकडे न जाता मनानेच वेदनाशामकांचे सेवन करतात. वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तीव्र वेदनेमुळे पीडित खिन्नतेलाही बळी पडू शकतो. तसेच त्याच्या मेंदूचा आकारही कमी होऊ शकतो. पाठदुखीने त्रस्त असलेल्या २६ लोकांवर वर्षभर केलेल्या अध्ययनात असे आढळले की, त्यांच्या मेंदूच्या ५ ते ११ टक्के पेशींची हानी झाली होती.दातांमध्ये असलेले जीवाणूच हिरड्यांच्या संसर्गास कारणीभूत असतात. दातांच्या योग्य स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास हृदयास धोका वाढतो. यामुळे अर्थेस्क्लेरॉसिसची होण्याची शक्यता असते. हा एका प्रकारचा हृदयरोग असून, यामुळे धमण्यांची लवचीकता कमी होते. ज्यांना हिरड्यांशी संबंधित विकार असतात, त्यांच्या दातात असलेले जीवाणू हिरड्यांच्या माध्यमातून रक्तवाहिन्यांमध्ये सहज प्रवेश करतात. फॅटी प्लाकची म्हणजेच दातावरील कीटची निर्मिती करू लागतात. त्यामुळे वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. तोंडात अनेक रसायनांच्या अभिक्रियांसोबत पचन प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आतड्यांना जास्त मेहनत करावी लागते. अशावेळी अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पचनाशी निगडित विविध विकार होण्याची शक्यता वाढते.