आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चुकीच्या जीवनशैलीमुळे अॅसिडिटी, गॅसच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांमुळे भूक हळूहळू कमी होते. भूक कमी झाल्याने शरीराला आवश्यक तेवढा आहार न मिळाल्याने आजार होण्याची शक्यता वाढते. भूक न लागण्याची समस्या असल्यास काही घरगुती उपाय लाभदायक ठरू शकतात. जाणून घ्या
* हिरवे धने, हिरवाई मिरची, टोमॅटो, अद्रक, पुदिना, जिरे, हिंग, मीठ आणि काळे मीठ टाकून तयार केलेली चटणी खाल्ल्यास भूक वाढते.
* एक ग्लास ताकामध्ये काळे मीठ, बारीक जीरा पावडर टाकून हे ताक पिल्यास पचनक्रिया वाढते. तसेच अरुची दूर होते.
* जेवण केल्यानंतर वज्रासनामध्ये थोडा वेळ बसावे. यामुळे अन्न पचन होऊन गॅसची समस्या दूर होते.
* जेवणाच्या एक तास अगोदर पंचसकार चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास चांगली भूक लागते.
* रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास सकाळी पोट साफ होते आणि भूक वाढते.
* जेवण झाल्यानंतर ओव्याचे चूर्ण थोड्याशा गुळासोबत कोमट पाण्यातून घेतल्यास जेवण सहजतेने पचते आणि योग्य वेळेला भूक लागते.
* जेवण झाल्यानंतर एक चमचा हिंगाष्टक चूर्ण खाल्ल्यास पचनक्रिया ठीक होते. भूक लागते.