आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दिवाळीच्या सणात मिठाईला खूप महत्त्व असते. या काळात सर्वजण मिठाई जास्त प्रमाणात खातात, तसेच इतरांना वाटतात. परंतु, ही मिठाई गोड विष ठरू शकते. कारण लाडू, बर्फी, खवा यात भेसळ असू शकते. काही नफेखोर या काळात भेसळयुक्त मिठाई विकतात. भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणते, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
हे आहेत दुष्परिणाम
१. भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने आतड्यांचे नुकसान होऊन पचनक्रिया बिघडू शकते.
२. फूड पॉयझनिंग होऊ शकते.
३. किडनी आणि लिव्हर खराब होण्याची दाट शक्यता असते.
४. कॅन्सरसुद्धा होऊ शकतो.
५. मिठाईत आरारोट सारखी पावडर वापरली असल्यास मुलांची हाडे कमकुवत होतात.
६. जास्त साखर असलेली मिठाई सतत खाल्ल्याने मुलांना डायबिटीजदेखील होऊ शकतो.