आरोग्यनामा ऑनलाईन टीम- मलेरिया हा डासांमुळे होणारा रोग आहे. संक्रमण झालेल्या डासाचा विषाणू रक्तप्रवाहाद्वारे लाल रक्तपेशीमध्ये प्रवेश करुन रक्तपेशी नष्ट करतो. या विषाणूला शरीरभर पसरायला २ ते ३ दिवस लागतात. यामुळे थंडी वाजणे, ताप येणे,उलट्या होणे, अतिसार सारख्या समस्या उद्भवतात. यामुळे शरीर खूप कमजोर बनते व पोषकतत्त्वांची कमतरता भासते म्हणून ही कमतरता भरून काढण्यासाठी काही पोषणतत्त्व शरीरात जाणे गरजेचे आहे. खालील डायट फॉलो केल्यास आपण नक्कीच मलेरियाच्या या रोगापासून वाचू शकता.
१)जास्तीत जास्त पाणी पिणे :
शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण किंवा लिक्विड इन्टेक जास्त असले पाहिजे. यामुळे किडनीतील या विषाणूला बाहेर पडण्यास सोपे जाते. तसेच नेहमी पाणी उकळून प्यायले प्यायले पाहिजे. सोबतच नारळपाणी, फळांचा ज्युस इ. चा समावेश करणे जरुरी आहे.
२) कार्बोहायड्रेट्स (कर्बोदके) :
कार्बोहायड्रेट्स किंवा जास्त प्रोटीनयुक्त अन्नपदार्थांचा जसे मांस,अंडी, दूध, भात, कडधान्ये यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. यामुळे पेशींना झालेले नुकसान भरून निघते.
३) ताजे फळ आणि पालेभाज्या :
पालेभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कारण पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन-सी असते तसेच ताजे फळे खाल्ल्यानेही शरीरास ताकद मिळते. गाजर, पपई, बीट,संत्री यांसारख्या फळांचा समावेश करावा.
४) जास्त चरबी वाढविणारे पदार्थ टाळणे :
तूप, तेल, मलाई सारखे चरबी वाढवणारे पदार्थ शक्यतो टाळावेत. यामुळे उलटी, मळमळ, कमजोरी यांसारख्या समस्या संभवू शकतात. तसेच कॉफी, तळेलेले पदार्थ, जंकफूड टाळावेत.
५) ओमेगा -३ फॅटी अॅसिड :
ओमेगा -३ फॅटी अॅसिड खाल्ल्याने शरीरात होणारी जळजळ आणि सुज कमी होते म्हणून ओमेगा ३- फॅटी एसिड असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.