आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जगभरात मधुमेहाच्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. भारतातही या रूग्णांची संख्या दरवर्षी वाढत आहे. जीवनशैलीशी संबंधीत हा आजार पूर्वी शहरापुरता मर्यादित होता, आता तो ग्रामीण भागातही वाढत आहे. अलिकडे लहान वयातही हा आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. या आजाराची लक्षणे आढल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे गेल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो. नियमित दिनचर्या आणि योग्य उपचाराद्वारे हा आजार नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. या आजाराचा परिणाम महिलांच्या मासिक चक्रासह कामेच्छेवरही होतो.
हे परिणाम होतात
* मधुमेह, महिलांच्या मासिक चक्राला आणि काम इच्छेलाही प्रभावित करतो. डायबिटीस पिडीत व्यक्तीच्या नाड्या क्षतिग्रस्त होतात. यामुळे कामोत्तेजना उशिरा होणे, परमोच्च आनंद मिळण्यात अडचण येणे, अशी लक्षणे दिसून येतात. डायबिटीस नियंत्रणात ठेवल्यास या समस्या होत नाहीत.
* मधुमेहामुळे दातांचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. हिरड्यांवर सूज येते.
* १३. ९० टक्के मधुमेहाचे रुग्ण लठ्ठपणाचे शिकार असतात.
* मधुमेह झाल्यानंतर पायातील हाडे कठीण होत कमकुवत होतात. त्वचा कोरडी पडते, केस गळतात.
* उपवासामुळे शरीरातील रासायनिक क्रियेत बदल होतो. त्याचा मधुमेहावर दुष्परिणाम होतो म्हणून पूर्ण उपवास करण्याचे टाळावे.
* किडनी फेल होण्याच्या सर्वेक्षणामध्ये ४४ टक्के रुग्ण मधुमेहग्रस्त आढळून आले आहेत.
* मधुमेह असेल तर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची शक्यता वाढते.
* दररोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ टेलिव्हिजनसमोर बसल्यास डायबेटीस वाढतो.
* धुम्रपान केल्याने मधुमेहाचा धोका वाढतो.
* आयुष्यातील ५ ते १० वर्ष कमी होतात.
* मधुमेहाच्या रुग्णांना फ्ल्यू-निमोनिया होण्याचा धोका जास्त प्रमाणत वाढतो.
हे उपचार करा
* वजन नियंत्रित ठेवा. समतोल व वेळेवर आहार घ्या.
* योग्य औषधोपचार घ्या. डॉक्टरांनी सांगितले असेल तर इन्सुलिनचे इंजेक्शन वा रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी गोळ्या वेळेवर घ्या.
* तीन महिने किंवा त्यापेक्षा मोठ्या बाळाला स्तनपान दिल्यास लहानपणात टाइप-१ मधुमेहाचा धोका कमी होतो. तसेच तरुणपणातही लठ्ठपणाचा धोका राहत नाही.
* नियमित व्यायाम करा.