आरोग्यनामा ऑनलाईन- अनियमित जीवनशैली, आहारातील निष्काळजीपणा आणि अनुवंशिकता अशा अनेक कारणांमुळं मधुमेह(diabetes!) होतो. जेव्हा मधुमेह होतो तेव्हा शरीरातील रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते. जर एकदा मधुमेह(diabetes!) झाला तर तो पुर्णपणे बरा होऊ शकत नाही. परंतु नियमित आहार आणि नियमित व्यायामाद्वारे तो संतुलित होऊ शकतो. इंसुलिनचे इंजेक्शन घेऊन किंवा औषधं घेऊन मधमेह नियंत्रणात ठेवला जातो. तुम्हाला माहित आहे का अशीही काही वनऔषधी आहेत ज्यामुळं तुम्ही मधुमेह नियंत्रणात ठेवू शकता. आज याचबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
1) गुळवेल – यालाच सायंटीफिक भाषेत टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया म्हणतात. गुळवेलाची पानं रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. यामुळं मधुमेह नियंत्रित करता येतो. त्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. यातील अँटीऑक्सिडंट्समुळं शरीरातून हानिकारक पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत करतात. या औषधामुळं स्वादुपिंडाच्या बीटा पेशींचं उत्पादन वाढवण्यात देखील मदत होते. यासाठी या औषधी वनस्पतीची पावडर किंवा पानं एक ग्लास पाण्यात बुडवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या.
2) सदाहिरत फुलं – सदाहरित फुलांचा वापर मधुमेहावर उपचार करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हे सदाबहार पेरीविंकल म्हणून ओखखलं जातं. टाईप-2 मधुमेहासाठी निसर्गोपचार म्हणून त्याची फुलं आणि पानं वापरली जातात. या वनस्पतीची काही पानं चघळा किंवा सदाहरित गुलाबी फुलं एक कप पाण्यात उकळून ते पाणी गाळू दररोज रिकाम्या पोटी घ्या. यामुळं शरीरातील साखर नियंत्रित होईल.
3) विजयसार – बऱ्याच आयुर्वेदीक संशोधनात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी विजयसार हे अत्यंत फायदेशीर औषध आहे. या औषधी वनस्पतीमधील अँटी हायपरलिपिडिक गुणधर्म शरीरात कोलेस्ट्रॉल, कमी घनता असलेल्या लिपोप्रोटीन आणि सीरम ट्रायग्लिसेराईडची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात. या व्यतिरीक्त वारंवार लघवी होणं, लघवी करताना जळजळ अशा मधुमेहामुळं उद्भवणाऱ्या समस्यादेखील दूर होतात. पचनतंत्रात सुधारणा होते. विजयसार रात्री पाण्यात उकळून ठेवा. हे पाणी सकाळी गाळून प्या.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.