आरोग्यानामा ऑनलाइन टीम – शरीराला पाण्याची आवश्यकता असते. योग्यप्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे शरीर निरोगी राहते. तसेच सर्व अवयवयांचे कार्य सुरळीत होते. मात्र, कमी पाणी प्यायल्यास आरोग्य बिघडू शकते. निरोगी राहण्यासाठी दिवसभरात पुरुषांनी सुमारे ३ लिटर आणि महिलांनी २ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे योग्य प्रमाण ८ ते १० ग्लास आहे. कमी पाणी प्यायल्यामुळे आरोग्याच्या कोणत्या समस्या निर्माण होतात, याविषयी माहिती घेवूयात.
हे आहेत दुष्परिणाम
पोटदुखी किंवा अॅसिडिटी
शरीरात पुरेसे पाणी नसल्यास जेवण केल्यानंतर अन्न व्यवस्थित पचत नाही. यामुळे पोटदुखी आणि अॅसिडिटीची समस्या निर्माण होते.
कोरडी त्वचा
पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरावरील त्वचा कोरडी होते. त्वचेमधील मॉइश्चर कमी होते.
युरीनचा रंग
युरीनचा रंग फिकट पिवळा, गडद पिवळा किंवा ब्राऊन झाल्यास हा शरीरात पाणी कमी असल्याचा संकेत समजावा.
डोकेदुखी
वारंवार डोकेदुखी, दिवसभर डोके जड होणे हा शरीरात पाण्याची कमतरता असल्याचा संकेत असू शकतो.
थकवा
शरीरात पाणी कमी असल्यास मेंदुला योग्य ऊर्जा मिळत नाही. यामुळे काम करण्यासाठी मेंदूला जास्त ताकद लावावी लागते. यामुळे थकवा वाढतो.
डोळ्यांची जळजळ
शरीरात पाण्याची कमी असल्यास डोळ्यांचा डड्ढायनेस वाढतो, यामुळे डोळ्यांवर सूज आणि जळजळ वाढू लागते.