आरोग्यानामा ऑनलाइन टीम : नोकरीनिमित्त दररोज तासाभरापेक्षा जास्त प्रवास करणारांची संख्या खुप आहे. परंतु, दररोज बस, कार, ट्रेनमधून असा प्रवास करणे हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे एका निरिक्षणातून समोर आले आहे. रॉयल सोसायटी ऑफ पब्लिक हेल्थने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे.
अहवालातील प्रमुख मुद्दे
१ अधिक वेळ प्रवासात गेल्यास, आरोग्यासाठी उपयुक्त संतुलित आहारापासून आपण वंचित राहतो. झोपही पूर्ण होत नाही. याचा परिणाम आरोग्यावर होतो.
२ कुटुंबीयांना किंवा मित्र परिवाराला वेळ देऊ शकत नसल्याने ४४ टक्के लोक प्रवासादरम्यान तणावात असतात.
३ प्रवासामुळे ४१ टक्के लोक फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी करतात. प्रवासादरम्यान जंकफूड खूप खाल्ले जाते.
४ भारतीय लोक प्रवासात आरोग्याची काळजी घेत नाहीत. इंग्लंडमधील लोक प्रवासात विशेष काळजी घेतात. ते लांबच्या प्रवासात सुमारे ८०० कॅलरीचे पदार्थ सोबत ठेवून ते सेवन करतात.
५ लांबच्या प्रवासामुळे ताण-तणाव तर वाढतोच शिवाय फिजिकल अॅक्टिव्हिटीही कमी होते. अशावेळी बीएमआय आणि ब्लड प्रेशरमध्ये वाढ होते.
Visit : arogyanama.com