आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गाईचे दूध आणि त्यापासून मिळणारे दही, ताक, लोणी आणि तूप हे अमृताचे भांडार आहे. असे म्हटले जाते की, फक्त गाईच्याच पाठीच्या कण्यात सूर्यकेतू नाडी असते. इतर प्राणी व मनुष्य ज्यांना ग्रहण करू शकत नाहीत, त्या सूर्याच्या गो-किरणांना सूर्यकेतू नाडी ग्रहण करते. ही नाडी क्रियाशील होऊन पिवळ्या रंगाचा एक पदार्थ स्रवते, ज्याला स्वर्णक्षार म्हणतात. याच कारणास्तव देशी गाईचे दूध, लोणी आणि तूप सुवर्णकांती प्रदान करणारे असते.
नियमित देशी गाईचे दूध सेवन करणारे निरोगी, वीर्यवान, बुद्धिमान, शक्तिशाली, आणि दीर्घायू होतात. विचारांमध्येही सात्विकता येते. जर्सी, होल्सटीन किंवा त्यांच्या संकरीत उपजातींच्या गाईंच्या दूधात हे गुण नाहीत. डेअरीतील पाश्चुरायझेशन प्रक्रियेमुळे दूधाचा सात्विक प्रभाव आणि पोषक तत्वे नष्ट होतात. उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होत असल्यास रात्री पापण्यांवर दूधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवल्यास डोळ्यांची लाली आणि जळजळ दूर होते. आम्लपित्ताच्या रुग्णाने दिवसातून दोन-तीनदा गार दूध एकेक घोट पीत त्यासोबत थोडेथोडे पाणी प्यावे.
रक्तपित्त म्हणजेच शरीरात निष्कारण कुठूनही रक्तस्राव होत असल्यास कच्च्या दूधात २ ग्रॅम गोखरू चूर्ण अथवा शतावरी किंवा जेष्ठमध चूर्ण मिसळून प्यायल्याने लाभ होतो. बद्धकोष्ठ म्हणजेच मलावरोध असल्यास गरम दूधाबरोबर इसबगोलची पूड किंवा गुलकंद घेतल्याने मलावरोध तसेच मूळव्याधीत लाभ होतो. आतड्यांचे रोग असल्यास जेवणापूर्वी एक चमचा कोमट दूधाने हळूहळू पोट आणि नाभीवर मालिश करावी. एक तास विश्रांती घेऊन मग जेवण करावे. जेवणानंतर लगेच लघुशंका केल्याने आतड्यांना येणारी सूज आणि इतर आजारही दूर होऊन आतडे मजबूत होतात.