आरोग्यनामा ऑनलाईन टीम – खाण्याचे अनेक पदार्थ आजही कोळश्यावर शिजवले जातात अथवा भाजले जातात. यामध्ये प्रामुख्याने रोटी, मक्याचे कणीस, तंदुरी आणि अन्य पदार्थांचा समावेश आहे. कोळसा किंवा लाकडाच्या आचेवर तयार करण्यात आलेले पदार्थ खाल्ल्याने हृदयासंबंधी आजार वाढण्याची शक्यता असते, असे ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड यूनिर्व्हसिटीमध्ये करण्यात आलेल्या संशोधनात आढळून आले आहे.
ही आहेत कारणे
1 अन्न शिजवण्यासाठी कोळसा, लाकूडसारख्या इंधनाचा वापर केल्याने वायु प्रदूषण वाढते.
2 जास्त काळ अन्न शिजवण्यासाठी कोळसा किंवा लाकडाचा वापर केल्याने वेगवेगळ्या हृदय रोगांचा धोका वाढतो.
3 कोळसा, लाकूड इंधनाच्या धुराचा हृदय आणि फुफ्फुसावर प्रभाव पडतो.
4 चपाती, मका किंवा आणखीही काही पदार्थ थेट कोळशाच्या आचेवर शिजवल्यास त्यांवर राख आणि कार्बनचे कण चिटकतात. जे आरोग्यासाठी धोकादायक असते.