आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वयोवृद्ध मधुमेहाने पीडित असतात हा समज आता चुकीचा ठरला आहे. कारण, अनियमित जीवनशैलीमुळे लहान मुले, किशोरवयीन मुले, मुली, तरूण-तरूणी सुद्धा यास बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना मधुमेह होणे हे सामान्य झाले आहे. फास्ट फूडचे अधिक सेवन, अनियमित जीवनशैली, अनियंत्रित वजन आणि शारीरिक हालचालीच्या अभावामुळे आजाराची निश्चित वयोर्मयादा घटत चालली आहे. मधुमेह मुळापासून नष्ट करता येत नसला तरी खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल करून त्यावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे.
इन्सुलीनमुळे शरीरातील यकृत, स्नायू व मेद उती पेशी आदी भागांना रक्ताच्या माध्यमातून ग्लुकोज मिळते. ग्लायकोजेनच्या रूपात इन्सुलीन यकृत आणि स्नायूंमध्ये जमा होते आणि शरीराला ऊर्जेसाठी मेदाचा प्रयोग करण्यापासून रोखते. याउलट काही कारणांमुळे इन्सुलीन कमी किंवा काहीच तयार झाले नसल्यास शरीर ऊर्जा स्रोताच्या रूपात ग्लुकोजऐवजी मेदाचा वापर करू लागते. अशावेळी जेवणातील कर्बोदके आणि प्रथिने पचवण्यास पीडित व्यक्ती असर्मथ ठरते. वजन वाढू लागते. अशा प्रकारे इन्सुलीनच्या पातळीवर परिणाम झाल्यास मधुमेह होतो. अशा स्थितीतच पीडितास इन्सुलीन डोस घ्यावा लागतो.
ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीही अत्यंत फायदेशीर आहे. एक ग्लास पाण्यात मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवावेत आणि सकाळी उठून चावून खावेत. मेथीच्या दाण्यांचे निश्चित प्रमाणातच सेवन करावे. गर्भवती महिलांनी त्याचे सेवन करू नये. आहारात कांद्याचा समावेश केल्यास किंवा सॅलडच्या रूपात सेवन केल्यासदेखील व्यक्तीची रक्तशर्करापातळी नियंत्रित राहते. एवढेच नाही तर यामुळे इन्सुलीनची निर्मिती होते आणि इन्सुलीन रिसेप्टर्सची संख्याही वाढते. लसणामुळे स्वादूपिंडाच्या पेशींचे नूतनीकरण होते. इन्सुलीनच्या निर्मितीतही लसूण सहाय्यभूत ठरतो.
तसेच कारल्यामुळेदेखील ग्लुकोज नियंत्रित राहतो. कारल्याचा ५०-६० मि. ली. रस पिल्यास पीडितास फायदा होतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्वासारखे भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे स्वादूपिंड इन्सुलीनची निर्मिती करण्यासाठी प्रेरित होतात. आवळ्यामध्ये लिंबाच्या तुलनेत १५ पट जास्त क जीवनसत्त्व असते. टाइप-१ डायबिटीज झाला असल्यास रूग्णाचे शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलीन तयार करू शकत नाही. या प्रकारचा मधुमेह लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्येच जास्त दिसून येतो. ही एक प्रकारची ऑटो इम्युन डिसऑर्डर असून स्वादूपिंड इन्शुलीनची निर्मिती करत नसल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. यामुळे रूग्णाला सामान्य आयुष्य जगण्यासाठी इन्सुलीनचा डोस घेण्याची गरज भासते. रूग्णाला जास्त तहान-भूक लागणे आणि जास्त जेवण केल्यावरदेखील वजन कमी होणे, असा त्रास होतो.
तर टाइप-२ डायबिटीज हा प्रामुख्याने प्रौढ आणि वयोवृद्धांमध्ये आढळून येतो. मात्र, अनियमित जीवनशैलीमुळे किशोरवयीन मुलेसुद्धा या आजाराने आता ग्रस्त होत आहेत. या आजारामुळे पीडित व्यक्तीच्या शरीरात इन्सुलीन तयार तर होते, पण पेशी हे इन्सुलीन शोषून घेऊ शकत नाहीत. अशावेळी रक्तात साखरेचे प्रमाण वाढते. वजन अनियंत्रित होण्याची किंवा लठ्ठपणा वाढण्याची शक्यता वाढते. जर वेळीच आजारावर नियंत्रण मिळवले नाही तर हृदयरोग, मूत्रपिंडाशी निगडित आजार, नेत्र विकार आणि नव्र्ह डॅमेज होण्याची शक्यता असते.
योगासने सुरू करताय ? मग या सूचनांचे आवश्य पालन करा
थोडे-थोडे खाण्याने चांगली राहते पचनक्रिया, दिवसभर मिळते ऊर्जा
दिवसातील २४ तासांपैकी २३ तास तुमचेच, फक्त १ तास शरीरासाठी द्या