आरोग्यनामा ऑनलाईन टीम – नारळपाणी पिण्याचे फायदे तर आपल्या सर्वांना ठाऊक आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकांसाठी नारळ पाणी उपयुक्त असते. केवळ नारळ पाणीच नाही आतील गरही आरोग्यास उपयुक्त असतो. चला जाणून घेऊ नारळाचे औषधी उपयोग
-पायांच्या भेगा कमी करण्यासाठी भातात नारळ मिसळून पेस्ट करून लावल्याने भेगा कमी होतात.
– मायग्रेनचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी नारळपाणी दिवसातून दोनवेळा सेवन करावा.
– स्टोनचा त्रास असल्यास रोज ५ ग्रॅम नारळाचा गर खावा आणि रोज यासोबत नारळ पाणीही पिणे फायदेमंद आहे.
– कांजण्या झाल्यास त्वचेची खूप जळजळ होत असेल तर नारळ पाण्याने शरीर धुवावे यामुळे जळजळ कमी होते. यामुळे डागही पडत नाही.
– नारळ पाण्यामध्ये कापूर मिसळून शरीराला लावल्याने त्वचा रोग कमी होते.
– पोटाचे त्रास असल्यास नारळ पाण्यात हिंग मिसळून पिल्याने खूप चांगला परिणाम होतो. दिवसातून दोनदा या पाण्याचे सेवन करावे.
– नारळ तेलाचा वापर नियमितपणे केसांसाठी केल्याने केस काळे, लांब आणि दाट होण्यात मदत होते. तसेच केस धुण्याच्या आधी केसांना नारळ पाणी लावून ३० मिनिटाने केस धुतल्याने केस गळती कमी होते.