आरोग्यनामा ऑनलाइन टीम – विविध खाद्यपदार्थांमध्ये चिंचेचा (Tamarind) वापर केला जातो. शिवाय, तिच्या आंबट-गोड चवीमुळे ती अशीच खाण्याचे प्रमाणही जास्त आहे. चिंचेत अनेक औषधी गुणधर्म असून उन्हाचा कडाका वाढल्यानंतर याचे सेवन करणे लाभदायक ठरते. पिकलेली चिंच (Tamarind) भूक वाढवते, चिंचेचे बी, टरफल यामध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आहेत.
हे आहेत उपाय
1) चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्र करून घेतल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी थांबते.
2) रक्तीआव, जुलाबाचा त्रास होत असल्यास चिंचोके पाण्यात वाटून सेवन करावेत.
3) चिंचेच्या टरफलापासून चिंचाक्षार तयार केले जाते. वेगवेगळ्या वनौषधी आणि चिंचाक्षार वापरून तयार केलेल्या शंखवटी गोळ्या पोटदुखीवर गुणकारी आहेत. लिंबू रसाबरोबर या गोळ्या सकाळ, संध्याकाळ दोन-दोन या प्रमाणात घ्याव्यात.
4) एक किलो पिकलेली चिंच, दोन लीटर पाण्यात चार ते पाच तास भिजत ठेवा.
नंतर ती कुसकरून पाणी गाळून घ्या. पाणी अर्धे होईपर्यंत आटवा.
त्यात दोन किलो साखर मिसळून पाक करावा. हे सरबत रात्री प्यावे. यामुळे सकाळी शौचाला साफ होते
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे