आरोग्यनामा ऑनलाईन- एखाद्या गोष्टीचा ताणतणाव असो किंवा मुड खराब असो किंवा थकवा दूर करण्यासाठी चहा(cardamom tea) हा भारतीय घरातील प्रत्येक समस्येवर उपाय आहे. बहुतेक कुंटुंबांमध्ये चहाशिवाय(cardamom tea) सकाळ होत नाही. खराब जीवनशैलीमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. लठ्ठपणा असलेले लोक, रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असलेले लोक, मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्यांना मधुमेहाचा धोका जास्त असू शकतो. मधुमेह हा केवळ एक जीवघेणा रोग नाही तर त्याच्या प्रभावांमुळे शरीर कमकुवत होते आणि इतर आजारांना बळी पडते. अशा परिस्थितीत मधुमेहाचे रुग्ण विलायची चहा घेऊ शकतात.
कसा फायदेशीर आहे :
विलायचीमध्ये मुबलक अॅन्टी-ऑक्सिडेंट आणि अँटी-बायोटिक्स असतात. हे घटक वजन कमी करण्यास प्रभावी आहेत, परिणामी, लोकांच्या शरीरात रक्तातील साखर नियंत्रण राहते. रोज एक चमचा विलायची पावडर वापरुन चहा पिल्याने शरीरावर मधुमेहाचा परिणाम कमी होतो. तणाव कमी करण्यासाठी विलायची देखील फायदेशीर मानली जाते. यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि हायपोलायपीडेमिक गुणधर्म आहेत, जे मधुमेहासाठी फायदेशीर आहेत.
साखरेशिवाय विलायची पावडर टाकून ३ प्रकारचे चहा पिल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांच्या शरीरात साखरेची पातळी नियंत्रित राहते.
१)दूध आणि विलायची चहा:
प्रथम उकळण्यासाठी एक वाटी पाणी घ्या. त्यात विलायची पावडर घाला. चहाची पाने घाला. आणि ते चांगले उकळून आपल्या चवीनूसार दूध घाला. चहा चांगला उकळून घेऊन हवे तसे त्यात आले आणि तुळशीची पाने घाला. यामुळे चहा अधिक फायदेशीर होईल. आपण इच्छित असल्यास, आपण गोडपणासाठी स्टेविया किंवा साखर घालू शकता.
२)वेलची आणि मिरपूड चहा:
एक वाटी पाणी उकळवा आणि त्यात २ विलायची आणि २ काळी मिरी आणि दालचिनीचा तुकडा घाला. आता ते चांगले उकळा आणि नंतर कमी आचेवर उकळून घ्या. दुधाशिवाय देखील हा चहा चांगला लागतो, तथापि, आपण इच्छित असल्यास आपण दूध देखील टाकू शकता.
३)काळा चहा:
जर आपण काळा चहा घेतला तर आपण त्यात विलायची घालू शकता. या चहामध्ये विलायची बारीक करून घ्या किंवा सोलून घ्या. आपण इतर मसाले देखील टाकू शकता.