आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सांधेदुखी हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. हा आजार सामान्य वाटत असला तरी त्याच्या वेदना कधीकधी खूप असह्य असतात. चिकुनगुन्यापासून संधिवातापर्यंत अनेक आजारात सांधेदुखीचे लक्षण दिसून येते. आमवातामुळे सांधेदुखी होण्याचे प्रमाण जास्त आहे. जगातील सुमारे एक टक्का लोक या आजाराने ग्रस्त आहेत.
ही आहेत लक्षणे
आमवातामध्ये छोट्या व मोठ्या सांध्याच्या ठिकाणी सूज व वेदना हे प्रमुख लक्षण असते. सांध्याची हालचाल करणे कठीण होते. सकाळी उठल्यावर एक-दोन तास सांधे आखडणे हे या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. ताप, भूक न लागणे, जडपणा, अपचन अशीही लक्षणे आढळून येतात. काही रुग्णांमध्ये सांध्याच्या जवळ गाठी होतात.
असे होते निदान
* सहा आठवड्यांपासून अधिक काळ सांधेदुखी
* दोनपेक्षा जास्त सांध्यामध्ये विकृती असणे
* आर. ए. फॅक्टर तपासणी पॉझिटिव्ह असणे
* इएसआर वाढलेला असणे
* सीआरपी व्हॅल्यू वाढलेली असणे
ही पथ्ये पाळा
* बाजरीची भाकरी, लसणाची चटणी, कुळीथ सूप खावे
* थंड हवा, थंड पाणी यांच्या संपर्कात जाऊ नये
* दही, आंबवलेले, शिळे, पदार्थ खाऊ नयेत
* दुपारी झोपू नये
* हलका व सूपचा आहार घ्यावा
* जेवताना दोन घास कमीच खावेत
हे उपाय करा
* काही विशिष्ट औषधी तेल वगळता इतर कोणतेही तेल लावल्यास आमवाताचा त्रास वाढतो. त्यामुळे आमवाताच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तेल लावू नये.
* योगराज गुग्गुळ, रास्नासप्तक काढा, गंधर्व तेल, अशी वातनाशक औषधे घ्यावी. तसेच रुक्ष स्वेद, वैतरण, बस्ती अशा पंचकर्म उपचारांनी हा आजार कायमचा बरा होतो.
* लवकरात लवकर उपचार सुरू करणे गरजेचे असते. अन्यथा कालांतराने हृदयाचा आकार वाढणे, हृदयाच्या झडपामध्ये विकृती येणे, सांध्यामध्ये कायमचा वाकडेपणा येणे अशी लक्षणे निर्माण होतात.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)