आरोग्यनामा ऑनलाइन टीम – योग्य आहार आणि नियमित व्यायाम यामुळे वजन नियंत्रणात येते. मात्र, नियंत्रणात असलेले वजन पुन्हा वाढू नये, यासाठी सतत काळजी घेणे आवश्यक असते. वजन योग्य प्रमाणात असल्यास प्रकृती सुद्धा चांगली राहते. त्यामुळे वजन वाढीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. पुन्हा वजन वाढू नये याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आहाराचे वेळापत्रक तयार करावे. जेवणाचा कंटाळा येणार नाही, उलट उत्साह वाटेल, असे आहाराचे वेळापत्रक तयार केले पाहिजे.
परदेशातील शाकाहारी लोकांचे वजन योग्य प्रमाणात असते. परंतु, आपल्याकडे व्यक्ती शाकाहारी असली तरी ती लठ्ठ असते. याचे कारण म्हणजे भारतातील शाकाहारी लोकांच्या जेवणात सलाड, फळांऐवजी तेलकट, अति कर्बोदकेयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात असतात.
हे उपाय करा
* आहाराचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे खूप गरजेचे आहे. मात्र, अनेकदा त्याचे पालन केले जात नाही. असे सतत होत गेल्यास त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात.
* वजन कमी करण्यासाठी उपाशी राहू नये. भूक लागल्यावर कच्चे अन्न, भाज्या, हंगामी फळे खावी. शंभर टक्के होलग्रेनने तयार केलेला ब्रेड किंवा रोटी खावी. नाष्ट्यात कडधान्ये, दही आणि पातळ पदार्थ खावेत.
लठ्ठपणामुळे होतात हे आजार
आहारात बिघाड झाल्यास शरीरात पोषक घटकांची कमतरता जाणवते. खूप वेळ बसल्याने स्थूलपणा, मधुमेह, हृदयविकार, ओस्टिओपोरोसिससारखे आजार होतात. चयापचय प्रक्रिया मंदावल्यास वजन वाढते. याचे प्रमुख कारण म्हणजे आपण व्यायाम करत असतो, मात्र पौष्टिक आहार घेत नसतो. त्यामुळे इन्सुलिनचे योग्य प्रमाण राखले जात नाही. त्यामुळे वजन वाढते. अनुवंशिकतेमुळेही वजन वाढते. अंडरअँक्टिव्ह थायरॉइड असल्यास वजन वाढते. हार्मोन्सचे असंतुलन हे यामागील प्रमुख कारण असते.