आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरातील कोट्यवधी पेशींना ऑक्सिजन, मिनरल्स आणि इतर पोषक तत्व पोहोचवण्याचे कार्य रक्त करते. याच पेशी निरोगी शरीराचे निर्माण करतात. चुकीचा आहार, अधिक आम्लीय पदार्थ आणि मिठाच्या सेवनाने रक्त दुषित करते. शरीरातील विजातीय पदार्थ म्हणजेच मल-मुत्र इत्यादी शरीरातून योग्यप्रकारे बाहेर पडले नाही तर ही घाण शरीरातील रक्तामध्ये मिसळते. ज्यामुळे विविध रोग उत्पन्न होतात. यामुळे त्वचा रोग होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे निरोगी आणि सुंदर शरीर हवे असल्यास रक्त शुद्धीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
रक्तशुद्धीचे हे उपाय करा
कडूनिंब
कडूनिंबाच्या पिकलेल्या दहा निंबोळ्या नियमित चोखल्यास रक्तविकार ठीक होतो. तसेच कडूनिंबाची पाने, फुले, साल, निंबोळ्या सर्व सामग्री सावलीत वाळवून घेऊन चूर्ण तयार करून घ्या. एक लहान चमचा दररोज या चूर्णाचे सेवन केल्यास रक्तदोष ठीक होतील.
कांदा
एक चतुर्थांश कप कांद्याच्या रसामध्ये संपूर्ण एक लिंबाचा रस किंवा मध मिसळून हे मिश्रण दहा दिवस नियमित घेतल्यास रक्तविकार दूर होऊन रक्त शुद्ध होते. कांद्याचा ताजा रस अर्धा कप, गाजराचा रस एक कप, पालकाचा रस एक कप हे तिन्ही एकत्र करून सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास रक्तविकार दूर होऊन रक्त शुद्ध होते.
हळद
अर्धा चमचा हळद, एक चमचा आवळा चूर्ण एकत्र करून गरम पाण्यातून घेतल्यास रक्त शुद्ध होते.
मनुका
२५ ग्रॅम मनुका रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी भिजलेल्या मनुका बारीक करून एक कप पाण्यातून घेतल्यास रक्त शुद्ध होईल.
मेंदी
रात्री स्वच्छ पाण्यामध्ये मेंदी भिजवून ठेवा, सकाळी सुती कपड्यातून गाळून ते पाणी प्यावे.
कारले
६० ग्रॅम कारल्याचा रस कपभर पाण्यामध्ये मिसळून नियमितपणे काही दिवस घेतल्यास शरीरातील दुषित रक्त स्वच्छ होते.
टोमॅटो
लाल टोमॅटोचा रस सकाळ-संध्याकाळ एक एक ग्लास घेतल्यास रक्त शुद्ध होते. त्वचेवर येणारे पुरळ, खाज, त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर लाल चट्टे या सर्व समस्या दूर होतात.
कोबी
कोबीमध्ये गंधक भरपूर पमाणात असते. गंधक खाज, कुष्ठ इत्यादी त्वचा विकारांवर लाभदायक आहे. कोबी रक्तशोधक असल्यामुळे वाफेवर शिजवून खावी. पाण्यामध्ये उकळल्यास गॅस निर्माण करते.
रुइचे फुल
रुइचे ताजे फुल आणि काळे मिरे समान प्रमाणत घेऊन बारीक कुटून घ्या. या मिश्रणाच्या वाटण्याच्या दाण्याएवढ्या बारीक गोळ्या तयार करून वाळवून घ्या. एक एक गोळी दिवसातून चार वेळेस पाण्यासोबत दोन महिने घ्यावी.
आवळा
रक्तामध्ये वाढलेली गरमी कमी करतो. रक्तामध्ये जमा झालेला मल, विष दूर कार्टून रक्त शुद्ध करतो. पेशी, कोशिकांना शुद्ध करतो. आवळा प्रत्येक प्रकारे शरीरातील प्रत्येक गोष्टीची स्वच्छता करतो. त्वचा रोगामध्ये आवळा लाभदायक आहे.
लिंबू
लिंबू रक्त शुद्ध करते. लिंबाचा रस गरम पाण्यातून दिवसातून तीन वेळेस घ्यावा. पाणी चहाप्रमाणे गरम असावे. एका लिंबाचे चार तुकडे करून घ्या. चार कप दुध घ्या. एक कप दुधामध्ये लिंबाचा एक तुकडा पिळून लगेच हे मिश्रण प्यावे. प्रत्येक दहा मिनिटांनी दुधाचे इतर कप अशाचप्रकारे पिऊन घ्यावेत. पाच आठवडे नियमितपणे अशाप्रकारे लिंबाचा उपाय केल्यास रक्त शुद्ध होऊन शरीर मजबूत होते.
दुध
कच्च्या दुधाची लस्सी घेतल्यास रक्त शुद्ध होते. चार दिवस दुधामध्ये मध टाकून हे मिश्रण घ्यावे.
आंबा
एक कप आमरस, एक चतुर्थांश दुध, एक चमचा अद्रकाचा रस, चवीनुसार बारीक खडीसाखर एकत्र करून हे मिश्रण नियमित घ्यावे. एक कप आंब्याच्या रसात अर्धा कप दुध, एक चमचा तूप, दोन चमचे अद्रकाचा रस मिसळून नियमित घ्यावे. यामुळे आरोग्य चांगले राहील आणी रक्तही शुद्ध होते.
कोरफड
कोरफड रक्तशोधक आहे. कोरफडीचा ताज गर २५ ग्रॅम, मध १२ ग्रॅम आणि लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ घ्यावे.